IND vs ENG : स्पिनर्सनंतर रोहित-यशस्वीच्या वादळासमोर इंग्लंड हतबल, असा होता पहिला दिवस

धरमशाला: धरमशाला कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने १ बाद १३५ धावा झाल्या आहेत. टीम इंडिया सध्या ८५ धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल नॉटआऊट राहिले. भारताचा कर्णधार ५२ धावांवर खेळत आहे. तर शुभमन गिल २६ धावांवर नाबाद आहे. यशस्वी जायसवाल ५७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वी जायसवालला शोएब बशीरने बाद केले.



रोहित-यशस्वीची तुफान खेळी


याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा संघ २१८ धावांवर आटोपला. याच्या प्रत्युत्तरात फलंदाजी करण्यास उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात शानदार राहिली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जायसवालने पहिल्या विकेटसाठी १०४ धावा जोडल्या. यशस्वी जायसवालने ५८ चेंडूत ५७ धावांची तुफानी खेळी केली. शोएब बशीरच्या बॉलवर बेन फोक्सने यशस्वी जायसवालला स्टंप आऊट केले.



जॅक क्राऊलीचे अर्धशतक, मात्र बाकी फलंदाज


टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्राऊली आणि बेन डकेटने चांगली सुरूवात करून दिली. दोन्ही सलामीवीरांना पहिल्या विकेटसाठी ६४ धावा जोडल्या. यानंतर सतत विकेट पडण्यास सुरूवात झाली. खासकरून इंग्ंलंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांकडे भारताच्या स्पिनर्सचे कोणतेही उत्तर नव्हते. १७५ धावांवर चौथा विकेट गमावणाऱ्या इंग्लंडच्या संघाचे ८ फलंदाज १८३ धावांपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतले.



भारतीय स्पिनर्ससमोर बेन स्टोक्सचा संघ ढेपाळला


भारतासाठी कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या गोलंदाजाने ५ फलंदाजांना बाद केले. रवी अश्विनने आपल्या १००व्या कसोटीत ४ विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळवण्यात यश मिळाले. भारतीय संघ दुसऱ्या दिवसापासून १ बाद १२४ धावांवरून पुढे खेळण्यास सुरूवात करेल.


भारत या कसोटी मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे पाचवी आणि शेवटची कसोटी जिंकत ४-१ने विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.

Comments
Add Comment

IND vs SL: आशिया कपमध्ये पहिल्यांदा धावसंख्या २०० पार, भारताचे श्रीलंकेसमोर विजयासाठी इतके मोठे आव्हान

दुबई: आशिया कप २०२५मधील १८व्या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २०३ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले आहे.

ICCने सूर्यकुमार यादवला ठरवले दोषी, ठोठावला दंड, निर्णयाला BCCI ने दिले आव्हान

दुबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांनंतर वाद सुरूच आहे. या मालिकेतील भारत आणि

IND vs PAK: आम्ही टीम इंडियालाही हरवू शकतो...बांगलादेशला हरवल्यानंतर पाकच्या कर्णधाराने दिले चॅलेंज

दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला आहे. बांगलादेशचा ११

Asis Cup 2025: आशिया कपच्या ४१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे हे...भारताविरुद्ध खेळणार हा संघ

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील निर्णायक सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव करत अंतिम

बिग बॅश लीगमध्ये रविचंद्रन अश्विन सिडनी थंडरकडून खेळणार

कॅनबेरा : अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन बिग बॅश लीगच्या आगामी हंगामासाठी सिडनी थंडरकडून खेळणार आहे. या

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ जाहीर