विचारपूर्वक विधाने करा, राहुल गांधींना निवडणूक आयोगाचा सल्ला

  89

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींना सल्ला दिला आहे की त्यांनी विचारपूर्व विधाने करावीत.निवडणूक आयोगाने राहुल गांधींसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपमानजनक विधाने केली होती.


लवकर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचाराला सुरूवात करतील. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींसाठी खास दिशानिर्देश जाहीर करण्यात आले आहेत.


यात त्यांना निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारची विधाने करताना ती विचारपूर्वक करावीत, वादग्रस्त टीकाटिप्पणी करू नये असा सल्ला दिला आहे. हे दिशानिर्देश १ मार्चला जारी करण्यात आले होते. यात निवडणूक आयोगाने सूचना दिली होती की पक्ष, उमेदवार तसेच स्टार प्रचारकांनी कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्यांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.


यात असेही म्हटले आहे की ज्या स्टार प्रचारक तसेच उमेदवारांना आधीच नोटीस मिळाली आहे त्यांनी पुन्हा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईला सामोले जावे लागू शकते.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )