नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींना सल्ला दिला आहे की त्यांनी विचारपूर्व विधाने करावीत.निवडणूक आयोगाने राहुल गांधींसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपमानजनक विधाने केली होती.
लवकर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचाराला सुरूवात करतील. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींसाठी खास दिशानिर्देश जाहीर करण्यात आले आहेत.
यात त्यांना निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारची विधाने करताना ती विचारपूर्वक करावीत, वादग्रस्त टीकाटिप्पणी करू नये असा सल्ला दिला आहे. हे दिशानिर्देश १ मार्चला जारी करण्यात आले होते. यात निवडणूक आयोगाने सूचना दिली होती की पक्ष, उमेदवार तसेच स्टार प्रचारकांनी कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्यांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
यात असेही म्हटले आहे की ज्या स्टार प्रचारक तसेच उमेदवारांना आधीच नोटीस मिळाली आहे त्यांनी पुन्हा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईला सामोले जावे लागू शकते.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…