Amit Shah : शरद पवारांनी महाराष्ट्राला हिशोब द्यावा

जळगाव : शरद पवार पवार हे पंतप्रधान मोदींकडे गेल्या दहा वर्षाचा हिशोब मागत आहेत. पण शरद पवार हे ५० वर्ष केंद्रात मंत्री होते, महाराष्ट्रातील जनता त्यांना सहन करत आहे. त्यांनी ५० राहिले निदान पाच वर्षाचा हिशेब महाराष्ट्राला द्यावा, अशी जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाजपाने येथे आयोजित केलेल्या युवा संमेलनात बोलताना केली.


भाजपाने नंदुरबार, धुळे, रावेर, जळगाव लोकसभा मतदारसंधातील युवकांसाठी मंगळवारी युवा संवाद संमेलनाचे आयोजन सागरपार्क मैदानावर केले होते. प्रथमच मतदान करणा-या विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या संमेलनास मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. यात युवतींची उपस्थिती लक्षणीय होती. अमित शहा यांचे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.


युवकांना मेरे दिलके टुकडे संबोधत त्यांनी भाषणास प्रारंभ केला. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही भारताला आत्मनिर्भर बनवणारी असल्याचे सांगत ही निवडणूक युवकांची आहे. युवकांच्या भविष्याची असल्याचे सांगितले. युवकांनो तुम्ही प्रथम मतदान करत आहात. लोकतंत्र मजबूत करणा-या पक्षाला मत देण्याचे आवाहन करताना आज घराणेशाही साठी एक आलेले पक्ष देश मजबूत ठेवू शकत नाही हे सांगताना काँग्रेसच्या सोनिया गांधी या राहुलला पंतप्रधान करू पाहत आहेत तर उध्दव ठाकरे हे आदित्यला मुख्यमंत्री आणि शरद पवार हे आपल्या कन्येला मुख्यमंत्री करू पाहतात. ममता बॅनर्जी भाच्याला मुख्यमंत्री करू पाहतात. यात घराणे आहे. प्रत्येकाचा स्वार्थ आहे. तुम्हा युवकांचा विचार आहे कुठे असा सवाल करत तुमच्यासाठी तुम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे आहे, असे सांगितले.


महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर टीका करताना, तिचा उल्लेख करताना तीनही चाके पंक्चर असलेली रिक्षा असा केला. शरद पवार ५० वर्ष मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राला धो धो धुतले तरी जनता सहन करत आहे, असा आरोप करत आहे ते पवार मोदींकडे दहा वर्षाचा हिशोब मागत आहेत. त्यांनी पन्नास राहू दया पण निदान पाच वर्षाचा तरी हिशोब जनतेला दयावा, अशी मागणी अमित शहा यांनी केली. काँग्रेसची कारकिर्द व भाजपाची तुलना करतांना मनमोहनसिंग यांनी सत्ता सोडतांना देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावर होती ती आज पाचव्या स्थानार आहे आपल्याला येत्या पाच वर्षात तिस-या स्थानावर आणायची असल्याचे सांगत भाजपाने युवकांसाठी केलेल्या विकास कार्याची माहिती दिली. आगामी काळात भाजप करू इच्छीत असलेले प्रकल्प सांगतांना सोनिया गांधी राहुलला तिस-यांना लाँच करत आहेत . इंडिया आघाडीतल्या पक्षांना आपल्या मुलांची चिंता आहे असे सांगत तुम्हाला काय हवंय, असा सवाल युवकांना करताच मोदी मोदी असा जल्लोष झाला.

Comments
Add Comment

Latur : शिवराज मोटेगावकरांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस; अनधिकृत बांधकाम प्रकरण तापले

लातूर : लातूर ग्रामीणमधील खोपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११४ मधील बांधकाम प्रकरणी विकासक Shivraj Motegaonkar यांना

Latur : लातूरच्या ‘ट्युशन एरिया’वर प्रशासनाचा मोठा घाव; अनधिकृत व्यवसाय बंद करण्याचे आदेश

लातूर : लातूरच्या शिक्षण व्यवसायावर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर

Gadchiroli : गडचिरोलीत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त करण्याच्या दिशेने पोलिसांनी आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. ‘ऑपरेशन

Maharashtra HSC Marksheet Date : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! ‘या’ तारखेपासून मिळणार मूळ गुणपत्रिका

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची

CM Fadnavis's Journey by Vande Bharat Train : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला वन्दे भारतने प्रवास, प्रवासादरम्यान केले फाईल्सचे कामही पूर्ण

मुंबई : पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी बाईकवरून विधान भवनात

Mango Juice Caused Poisoned : "आंब्याचा रस पिल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना झाली विषबाधा !"

अहिल्यानगर : मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबात चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.