Uddhav Thackeray : रोज गळ्यात नवा हार, आयडालॉजी तडीपार!

व्यंगचित्रातून भाजपने उद्धव ठाकरेंना लगावली चपराक


मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) सर्वच राजकीय पक्षांनी (Political parties) कंबर कसली आहे. त्यातच आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी विरोधी पक्षांवर नेत्यांकडून जोरदार वार प्रतिवार केले जात आहेत. सत्ताधारी व विरोधींनी एकमेकांविरोधात टीकास्त्र उपसले आहे. त्यातच ठाकरे गटाचे (Thackeray Group) मुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपबाबत 'अबकी बार, भाजप तडीपार', अशी टीका केली. त्यांच्या या टीकेला आता भाजपकडून (BJP Party) चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.


भाजपने आपल्या अधिकृत एक्स (X) अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचे एक व्यंगचित्र (Caricature) शेअर करत ठाकरेंना जोरदार चपराक लगावली आहे. या व्यंगचित्राला 'रोज गळ्यात नवा हार, आयडालॉजी तडीपार!', असं कॅप्शन देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे नेहमी कोणत्या ना कोणत्या पक्षाबाबत बोलतात मात्र त्यांना आता स्वतःची विचारधारा राहिलेली नाही, अशी टीका यातून करण्यात आली आहे.





या व्यंगचित्रात उद्धव ठाकरेंच्या गळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे हार घातले आहेत, असं दाखवलं आहे. मात्र, त्यांची आयडिऑलॉजी यात तडीपार झाली आहे, अशी टीका भाजपने केली आहे.

Comments
Add Comment

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांचे ५० वर्षांनी वाढणार आयुष्य

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहर विभागातील १०० वर्षे जुन्या भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे

Kishori Pednekar: विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या पेडणेकर आधीच पोहोचल्या नाल्याच्या काठावर

मुंबई: मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांत सत्तेवर असताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाही तर जुनच्या

प्रकल्पबाधितांच्या सदनिका वाटपाची प्रक्रिया सुलभ करा; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले मालमत्ता विभागाला निर्देश

मुंबई: मुंबईतील सदनिकांची वाढती मागणी लक्षात घेता, प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी (पी ए पी) सदनिका उपलब्ध करून

Ashwini Bhide: गारगाईसह समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला गती द्या; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे जलखात्याला आदेश

मुंबई: समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या ४००

मध्य रेल्वेचा शनिवार, रविवार मेगा ब्लॉक; उपनगरीय व मेल-एक्स्प्रेस सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ४ एप्रिल २०२६ रोजी ठाणे व डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तार तसेच परळ आणि करी रोड

महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होताच आश्विनी भिडे यांनी घेतला धाडसी निर्णय

ई-ऑफिस,पेपरलेस करण्याचे सर्व खात्यांना दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी