Uddhav Thackeray : रोज गळ्यात नवा हार, आयडालॉजी तडीपार!

व्यंगचित्रातून भाजपने उद्धव ठाकरेंना लगावली चपराक


मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) सर्वच राजकीय पक्षांनी (Political parties) कंबर कसली आहे. त्यातच आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी विरोधी पक्षांवर नेत्यांकडून जोरदार वार प्रतिवार केले जात आहेत. सत्ताधारी व विरोधींनी एकमेकांविरोधात टीकास्त्र उपसले आहे. त्यातच ठाकरे गटाचे (Thackeray Group) मुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपबाबत 'अबकी बार, भाजप तडीपार', अशी टीका केली. त्यांच्या या टीकेला आता भाजपकडून (BJP Party) चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.


भाजपने आपल्या अधिकृत एक्स (X) अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचे एक व्यंगचित्र (Caricature) शेअर करत ठाकरेंना जोरदार चपराक लगावली आहे. या व्यंगचित्राला 'रोज गळ्यात नवा हार, आयडालॉजी तडीपार!', असं कॅप्शन देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे नेहमी कोणत्या ना कोणत्या पक्षाबाबत बोलतात मात्र त्यांना आता स्वतःची विचारधारा राहिलेली नाही, अशी टीका यातून करण्यात आली आहे.





या व्यंगचित्रात उद्धव ठाकरेंच्या गळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे हार घातले आहेत, असं दाखवलं आहे. मात्र, त्यांची आयडिऑलॉजी यात तडीपार झाली आहे, अशी टीका भाजपने केली आहे.

Comments
Add Comment

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी

‘एआय’, डिजिटल सुविधा आणि विविध योजनांमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम होणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नैसर्गिक शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांवर

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची

नियम व अटींची पूर्तता केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी मिळणार; मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील गुंठेवारी नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुंठेवारी विकास नियमित

राज्यातील चेक पोस्ट बंद करणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आश्वासन

मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल