Prasad Lad : मनोज जरांगे बडबड बंद करा अन्यथा मराठा समाजच जागा दाखवून देईल!

  193

प्रसाद लाड यांचा जरांगेना इशारा


मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) संतप्त आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधात टीकास्त्र उपसले आहे. मनोज जरांगे हे पातळी सोडून भाषा वापरत असल्यामुळे मराठा समाजातील काही लोकांनीही नाराजी दर्शवली आहे. त्यातच भाजप नेते व देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही मनोज जरांगे यांना लक्ष्य केले. 'मनोज जरांगे बडबड बंद करा अन्यथा मराठा समाजच जागा दाखवून देईल!', असा इशारा त्यांनी जरांगेंना दिला आहे.


मनोज जरांगे पाटील गेले काही दिवस सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट भाषेत टीका करत आहेत. रविवारीदेखील जरांगे पाटील यांनी फडणवीसांनी आपल्याविरोधात डाव रचल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना फटकारले. त्यांनी म्हटले की, 'मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा नौटंकी सुरु झाली आहे. ते पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करु लागले आहेत. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवत आहेत', अशी टीका त्यांनी केली.


पुढे प्रसाद लाड म्हणाले, 'यापूर्वीही मनोज जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची होती. आतादेखील ते शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत आहेत. शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज सरकारसोबत आहे. मनोज जरांगे अशीच बडबड करत राहिले तर समाज त्यांना नक्कीच जागा दाखवेल', असे लाड यांनी म्हटले.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक