Poems : काव्यरंग

जगू कशी तुझ्याविना...
श्वास श्वास कोंडताना
साद न येई हाकेला
दूर जाता कलेवर
हुंदकाही अडलेला...

हात तुझा हातातला
सोडवेना सख्या मला
सनईच्या सूरातली
शांत झाली रागमाला...

दर्दभऱ्या एकांताच्या
राती कितीक झेलल्या
ओघळत्या आसवांनी
माझ्या पापण्या गोठल्या...

मुकपणा विरलेले
शब्द होते सोबतीला
उजागर झुल्यावर
पीळ बसतो मनाला...

सांगूनिया जा मजसी
असा काय माझा गुन्हा
परतीच्या पावलांनी
रंग भरावे तू पुन्हा...

संकटाच्या वादळाचा
ढग अंगावर आला
जगू कशी तुझ्याविना
पूर अश्रूंचा वाहिला...

- पूजा काळे, बोरिवली

वसंतोत्सव


नवचैतन्ये वसंत नटला
तरुवेलींचा सुगंध सुटला ||धृ||

बहावा तरी सुंदर सजला
पर्णपाचुतुनी.बहरु लागला
पीतफुलांनी डोलत सुटला
पांथस्थांना सुखवु लागला ||१||

गुलमोहराच्या पायघड्यांनी
रस्ता सारा मखमली बनला
रक्तवर्ण हा तळपू लागला
ग्रीष्मासंगे फुलून आला ||२||

पळस,पांगिरा फुलांनी नटला
हिरव्या कोंदणी ठसा उमटला
मनासी वेधत खुलवू लागला
संगतीने ग्रीष्मात हरवला ||३||

आम्रतरुही मोहोरुनी गेला
कैरीफळांचे तोरण ल्याला
कोकिळ कूजनी रंगुन गेला
आमराईचे भूषण बनला ||४||

- दीप्ती कोदंड-कुलकर्णी, कोल्हापूर.
Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

विश्वासघात

संस्कृतीचा गोडवा-पूर्णिमा शिंदे पुण्यातील कर्वेनगर येथे स्थायिक असलेले संध्या आणि विनोद शहा हे व्यापारी असतात.

बाळू

नक्षत्रांचे देणे- डॉ. विजया वाड बाळू माझा विद्यार्थी. अगदी भारी दांड. मी तेव्हा उदयाचलात पर्यवेक्षक होते. एका