मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीनंतर नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित असलेले महाराष्ट्र भवनाचे भूमीपूजन करण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री. तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.
सिडको वतीने वाशी सेक्टर- ३० येथे ‘महाराष्ट्र भवन’ साठी भुखंड दिला आहे. देशातील अनेक राज्यांचे भवन बाधून तयार झाले आहेत. परंतू, महाराष्ट्र भवनाचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र भवन सुद्धा भव्य दिव्य उभारण्यात यावे यासाठी बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे या सिडको, महापालिका आणि राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करत आहेत.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करताना पुन्हा मंदा म्हात्रे यांनी महाराष्ट्र भवनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मे महिन्यात संपल्यानंतर, मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येईल, असे सांगितले.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…