शिष्यवृत्ती योजनेला एक महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी

नवी मुंबई (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे शिष्यवृत्ती योजने पासून शहरातील गरीब व गरजू विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शिष्यवृत्तीच्या प्रथम व द्वितीय टप्प्याची ऑनलाईन प्रक्रियेची वेबसाईट बंद न करता १ महिन्याची मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.


नवी मुंबई शहरातील गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून महापालिकेच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्याचे बँक पासबुक, उत्पन्नचा दाखला, जातीचा दाखला, शाळा व महाविद्यालया कडील घोषणापत्र तसेच इतर दस्तावेज साठी लागणारा कालावधी विचारात घेता गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये यासाठी,
ज्या लाभार्थ्यांनी प्रथम टप्प्यात नोंदणी अर्ज भरलेले आहे, परंतु द्वितीय टप्प्यासाठी अपलोड करावयाचे आवश्यक पुरावे जमा करण्यासाठी विलंब होत आहे, अपलोड करण्याची अंतिम मुदत दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच आहे. सदरच्या मुदतीत जर वाढ केली गेली नाही किमान ४० हजारांहून अधिक लाभार्थी विद्यार्थी हे शिष्यवृत्ती नोंदणी करून देखिल त्यांना शिष्यवृत्ती योजने पासून वंचित राहावे लागेल.


शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज दाखल करताना ऑनलाईन अर्ज दाखल करताना येणाऱ्या अडचणी व कागदपत्र तयार करण्यासाठी लागणारा वेळ हे लक्षात घेता तसेच शिष्यवृत्ती योजने पसून गरजू विद्यार्थ्यां वंचित राहू नये यासाठी या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास किमान १ महिना मुदतवाढ द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केले.

Comments
Add Comment

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया

परिणामकारक महसूल सेवेसाठी राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधने

मुंबई : महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर

BMC : स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांनी स्वयंशिस्त मोडमध्ये यावे!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नागरी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे नमुद केले. स्वच्छतेकडे एखाद्या

BMC : 'मुंबईत एकही गटाराचे झाकण उघडे राहता कामा नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोणत्याही परिस्थितीत एकही मनुष्य प्रवेशिका अर्थात गटाराची झाकणे उघडी राहणार नाही, याची