शिष्यवृत्ती योजनेला एक महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी

नवी मुंबई (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे शिष्यवृत्ती योजने पासून शहरातील गरीब व गरजू विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शिष्यवृत्तीच्या प्रथम व द्वितीय टप्प्याची ऑनलाईन प्रक्रियेची वेबसाईट बंद न करता १ महिन्याची मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.


नवी मुंबई शहरातील गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून महापालिकेच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्याचे बँक पासबुक, उत्पन्नचा दाखला, जातीचा दाखला, शाळा व महाविद्यालया कडील घोषणापत्र तसेच इतर दस्तावेज साठी लागणारा कालावधी विचारात घेता गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये यासाठी,
ज्या लाभार्थ्यांनी प्रथम टप्प्यात नोंदणी अर्ज भरलेले आहे, परंतु द्वितीय टप्प्यासाठी अपलोड करावयाचे आवश्यक पुरावे जमा करण्यासाठी विलंब होत आहे, अपलोड करण्याची अंतिम मुदत दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच आहे. सदरच्या मुदतीत जर वाढ केली गेली नाही किमान ४० हजारांहून अधिक लाभार्थी विद्यार्थी हे शिष्यवृत्ती नोंदणी करून देखिल त्यांना शिष्यवृत्ती योजने पासून वंचित राहावे लागेल.


शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज दाखल करताना ऑनलाईन अर्ज दाखल करताना येणाऱ्या अडचणी व कागदपत्र तयार करण्यासाठी लागणारा वेळ हे लक्षात घेता तसेच शिष्यवृत्ती योजने पसून गरजू विद्यार्थ्यां वंचित राहू नये यासाठी या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास किमान १ महिना मुदतवाढ द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केले.

Comments
Add Comment

भायखळा के पी रोडवर भीषण अपघात पार्सल चा ट्रक उलटला

मुंबई: मुंबईतील भायखळ्याच्या के. पी. रोडवर पार्सलचा ट्रक उलटून अपघात, वाहन चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची

मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल पाडणार... आता पुढे काय?

स्थानिक लोकांचा जोरदार विरोध, पुनर्वसनाच्या मागणीवर भर मुंबई: मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ