Manoj Jarange Patil : अंतरवालीतील मंडप काढण्याच्या हालचाली; जरांगे छ. संभाजीनगरमधून तडक निघाले...

  124

जालना : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्य सरकारमधील संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर उपचारांकरता ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे दाखल झाले होते. त्यानंतर सरकारने अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळाचा मंडप पोलिसांच्या माध्यमातून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे जरांगेंना समजले आणि ते सलाईन काढून तडक जालन्याच्या दिशेने निघाले.


दरम्यान, अंतरवालीकडे निघालेल्या मनोज जरांगे यांची पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेतली. मंडप सध्या तरी हटवण्यात येणार नाही असं आश्वासन पोलिसांनी जरांगे यांना दिलं आहे. पोलिसांच्या आश्वासनानंतर ते थांबले.



मंडपातील एक कापडही काढू देणार नाही : मनोज जरांगे


या प्रकारानंतर मनोज जरांगे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पुन्हा आक्रमक झाले आहेत. जरांगे म्हणाले, जेलमध्ये सडायला तयार आहे पण अंतरवालीतील मंडपातील एक कापडही काढू देणार नाही. तुमच्या हातातील संधी गेली नाही. तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, ओबीसीतून आरक्षण द्या. अंगावार येण्याचा प्रयत्न करु नका. मी हॉस्पीटल सोडलं अन् माझ्या अंगाला जरी धक्का लागला तर बघा. मी मराठा समाजासाठी मान देखील कापून द्यायला तयार आहे. आमचे लोक सरकारने सोडावे. आमच्या मंडपाला, व्यासपीठीला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावणार नाही असा शब्द द्यावा. जर लावाला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.


मनोज जरांगे यांच्या अशा पद्धतीच्या भाषेवर सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही तीव्र नाराजी दर्शवली असून येत्या काळात हा संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित