Mann Ki Baat: पुढील तीन महिने 'मन की बात' होणार नाही, खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) रविवारी आपला मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात(mann ki baat)च्या ११०व्या एपिसोडच्या माध्यमातून लोकांना संबोधित केले. या दरम्यान पंतप्रधानांनी तीन लोकांशी फोनवर बातचीतही केली. तसेच विविध सरकारी योजनांबद्दलचा त्यांचा अनुभव जाणून घेतला. पंतप्रधान मोदींनी यावेळी प्राकृतिक शेतीचे महत्त्व रेखांकित करताना केमिकलने आपल्या धरती मातेला जो त्रास होत आहे तो वाचवण्यासाठी मातृसंस्थेचे मोठे योगदान होत आहे. देशातील कोपऱ्याकोपऱ्याक महिला आता नैसर्गिक शेतीचा विस्तार करत आहेत.



पुढील तीन महिन्यांपर्यंत 'मन की बात'ला ब्रेक


पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की ते पुढील तीन महिने आता मन की बातचा कार्यक्रम करणार नाहीत. मन की बातमध्ये देशाची सामूहिक शक्ती तसेच मिळालेल्या यशाबद्दल चर्चा होत असे. हा एक प्रकारचा जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेद्वारे तयार होणारा कार्यक्रम आहे. आता पुढील तीन महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही.


पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. त्यामुळे जे गेल्यावेळेस झाले होते त्याप्रमाणे मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मन की बातमध्ये देशाच्या सामूहिक शक्तीबद्दल बोलले जाते. देशाच्या यशाबद्दल बोलले जाते.


हा एक प्रकारचा जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेने तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र तरीही राजकीय मर्यादेचे पालन करताना लोकसभा निवडणुकीच्या या दिवसांमध्ये पुढील ३ महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही. आता मन की बातमध्ये संवाद होईल तो मन की बातच्या १११व्या एपिसोडमध्ये. पुढील वेळेस मन की बातची सुरूवात १११ या शुभ अंकांनी झाली तर यापेक्षा चांगले काय असणार आहे.

Comments
Add Comment

Manipal health share price : मणिपाल हेल्थचे शेअर बाजारात धमाकेदार पदार्पण! IPO च्या किमतीपेक्षा ११% प्रिमियमवर लिस्टिंग

बंगळुरू : प्रायमरी मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळवल्यानंतर 'मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस' (Manipal Health Enterprises) या

Father kills pregnant daughter : गर्भवती लेकीची वडिलांकडून नदीत बुडवून हत्या; हत्येचा व्हिडिओ बनवून दाखल केली खोटी तक्रार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) अनैतिक गैरप्रतिष्ठेतून जन्मदात्या बापानेच लेकीचा बळी घेतल्याची एक सुन्न

Central Railway : पुरुषांनो लक्ष द्या! महिलांच्या डब्यात पाय ठेवला तर दंड अन् थेट... मध्य रेल्वेचा मोठा निर्णय!

मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य

Heavy Rain India : देशभरात मुसळधार पावसाचा कहर; झारखंड-उत्तर प्रदेशात वीज कोसळून 16 जणांचा मृत्यू

Heavy Rain India : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबत वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी जीवितहानी

Vehicle Insurance : गाडी चालवणाऱ्यांची धाकधूक वाढली! आता पेट्रोल पंपावर होणार 'ही' मोठी तपासणी; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिल्ली : रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत, वैध विमा

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन