१३१ बॉलमध्ये सामन्याचे बदलले चित्र, टीम इंडियाने इंग्लंडच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास

Share

रांची: भारताने इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. रांचीमध्ये खेळवण्यात आलेल्या चौथ्या कसोटीत टीम इंडियाने ५ विकेटनी विजय मिळवला. इंग्लंडने हैदराबादमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात विजय मिळवत आघाडी घेतली होती. यानंतर विशाखापट्टणम, राजकोट आणि रांचीमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारताने सलग विजय मिळवत मालिका खिशात घातली. हा सामना एका खेळाडूने १३१ चेंडूत पलटवला आणि इंग्लंडच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला.

रांची कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ज्यो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर संघाने पहिल्या डावात ३५३ धावा केल्या. भारत पहिल्या डावात अडचणीत अडकला होता. संघाने १७७ धावांवर आपल्या ७ विकेट गमावल्या मात्र येथे कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल यांची भागीदारी संघासाठी महत्त्वाची ठरली.

त्यांच्या भागीदारीमुळे भारताने ३०० पार धावसंख्या करता आली. ४६ धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात खेळण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला केवळ १४५ धावा करता आल्या. आर अश्विनने या डावात ५ विकेट मिळवल्या तर कुलदीप यादवने ४ विकेट मिळवल्या.

१३१ बॉलने कसे बदलले सामन्याचे चित्र

भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या आपल्या पहिल्या डावात १७७ धावांवर ७ विकेट गमावून बसला होता. येथून एकजरी विकेट पडण्याचा अर्थ टीम इंडिया इंग्लंडच्या खूप धावांनी पिछाडीवर गेली असती. कुलदीप यादवने ध्रुव जुरेलसोबत मिळून ८व्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. १३१ चेंडूचा सामना करताना २ चौकाराच्या मदतीने २८ धावा केल्या. कुलदीप यादवच्या या खेळीने सामन्याचे चित्र बदलले आणि इंग्लंडला अवघ्या ४६ धावांनी आघाडी घेता आली.

Recent Posts

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

19 minutes ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

43 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

1 hour ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

2 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

2 hours ago