Poems : काव्यरंग

अभिमान मराठी


उत्तुंगतेचे शिखर गाठले
सह्याद्रीने तट राखले
अरबीच्या उसळती लाटा
गड, किल्ल्यांनी वैभव जपले


या मातीचा सुगंध जगवा
शान आमुची फडकता भगवा
वीर आणि पराक्रमाची
ऐतिहासिकता संगे भगवा


मना मनातून जगतो शिवाजी
पाठराखीला लढतो संभाजी
बलिदानाचे हे तेज वाहतो
अभिमानाचा शिरपेच धारतो
माणिक मोती येथे पिकाती
संस्काराचे धडे गिरवती
सीमापार गाजे याची महती
अभेद्य आहे मराठी कीर्ती


जन्म लाभला या धरीवर
अभिमान जगाला शुरविरांवर
ओठात मधाळ बोलतो मराठी
हे भाग्य लाभले जन्मलो मराठी
- राजश्री बोहरा




माझी माय मराठी


माझी माय मराठी
अभिमाने येते ओठी ||धृ।।
कवितेसह हर्षे येते
भारूड, गवळण गाते
पोवाड्यांतुनी ही रमते
ओव्यांमधुनी ती सजते ||१||


विश्वात कथेच्या फुलते
शब्दालंकारे खुलते
वास्तवास न्याय ही देते
आविष्कारातुनी नटते ||२||


कधी कादंबरी ही बनते
अन् शब्दांसह डोलते
भेदक, वेधक ती ठरते
सकलांना काबिज करते ||३||


लालित्ये ही मांडते
संवादांनी उलगडते
तेजोन्मेषे नि पांडित्ये
मोहिनी जणू घालिते ।।४।।


सारस्वतासी जी स्फुरते
नाट्यातुनी ही प्रगटते
नवरसातुनी दर्शविते
विश्वाला स्पर्श ही करते ||५||


- दीप्ती कोदंड कुलकर्णी, कोल्हापूर



ऋणानुबंध


आभाळ जेव्हा कडाडून भांडतं
तेव्हाच त्यातून
पाणी सांडतं


झाड बहरून छत्री खोलतं
तेंव्हाच त्याला हे ऊन पेलतं


वारा उनाड
सैर-भैर होतो
तेव्हाच सुंई सुंई
गाणे गातो


सूर्य तापून होतो लाल
तेव्हाच फुलांचे सुकतात गाल


माती भिजून होते गाळ
तेव्हाच त्यातून
पिकते साळ


जेव्हा तेव्हाचा ऋणानुबंध
घ्या आनंद नि
लिहा निबंध


- भानुदास धोत्रे, परभणी

Comments
Add Comment

धास्ती चीनच्या नौदलाची

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव चीनच्या नौदलाची ताकद अमेरिकेपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून जहाज

ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते नाना पाटेकर 

कोकणी बाणा : सतीश पाटणकर तगडा अभिनय, जबरदस्त संवादफेक, समोरच्याला आपल्या डोळ्यांनीच घायाळ करणारे व्यक्तिमत्त्व

मानव-सर्पातील वाढता संघर्ष

हवामानबदलामुळे विषारी सापांच्या नैसर्गिक अधिवासात बदल होत असून मानव-साप संघर्षाचा धोका वाढू शकतो. एका

और क्या जुर्म है, पता ही नहीं !

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे चिंतनशील मनांना कधीकधी अगदी मूलभूत प्रश्न पडत असतात. ज्यांना नशिबाने कोणतेच

मैत्रीण नको आईच होऊया !

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू मागील लेखात मैत्रीण नको आईच होऊया याबद्दल आपण काही ऊहापोह केला होता, मात्र

भुरिश्रवा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे माहाभारत युद्ध हे कौरव-पांडवांमध्ये लढले गेले. कौरव-पांडवांमधील प्रमुख