Poems : काव्यरंग

  31

अभिमान मराठी


उत्तुंगतेचे शिखर गाठले
सह्याद्रीने तट राखले
अरबीच्या उसळती लाटा
गड, किल्ल्यांनी वैभव जपले


या मातीचा सुगंध जगवा
शान आमुची फडकता भगवा
वीर आणि पराक्रमाची
ऐतिहासिकता संगे भगवा


मना मनातून जगतो शिवाजी
पाठराखीला लढतो संभाजी
बलिदानाचे हे तेज वाहतो
अभिमानाचा शिरपेच धारतो
माणिक मोती येथे पिकाती
संस्काराचे धडे गिरवती
सीमापार गाजे याची महती
अभेद्य आहे मराठी कीर्ती


जन्म लाभला या धरीवर
अभिमान जगाला शुरविरांवर
ओठात मधाळ बोलतो मराठी
हे भाग्य लाभले जन्मलो मराठी
- राजश्री बोहरा




माझी माय मराठी


माझी माय मराठी
अभिमाने येते ओठी ||धृ।।
कवितेसह हर्षे येते
भारूड, गवळण गाते
पोवाड्यांतुनी ही रमते
ओव्यांमधुनी ती सजते ||१||


विश्वात कथेच्या फुलते
शब्दालंकारे खुलते
वास्तवास न्याय ही देते
आविष्कारातुनी नटते ||२||


कधी कादंबरी ही बनते
अन् शब्दांसह डोलते
भेदक, वेधक ती ठरते
सकलांना काबिज करते ||३||


लालित्ये ही मांडते
संवादांनी उलगडते
तेजोन्मेषे नि पांडित्ये
मोहिनी जणू घालिते ।।४।।


सारस्वतासी जी स्फुरते
नाट्यातुनी ही प्रगटते
नवरसातुनी दर्शविते
विश्वाला स्पर्श ही करते ||५||


- दीप्ती कोदंड कुलकर्णी, कोल्हापूर



ऋणानुबंध


आभाळ जेव्हा कडाडून भांडतं
तेव्हाच त्यातून
पाणी सांडतं


झाड बहरून छत्री खोलतं
तेंव्हाच त्याला हे ऊन पेलतं


वारा उनाड
सैर-भैर होतो
तेव्हाच सुंई सुंई
गाणे गातो


सूर्य तापून होतो लाल
तेव्हाच फुलांचे सुकतात गाल


माती भिजून होते गाळ
तेव्हाच त्यातून
पिकते साळ


जेव्हा तेव्हाचा ऋणानुबंध
घ्या आनंद नि
लिहा निबंध


- भानुदास धोत्रे, परभणी

Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले