Manoj Jarange Patil : माझा बळी घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर येतो! मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांना धमकी

  104

जरांगे उठून निघाले आणि सागर बंगल्याकडे जाताना रस्त्यात भोवळ येऊन पडले...


मनोज जरांगे आक्रमक; मराठा बांधवांचंही ऐकेनात!


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) समाधानी नसून आज त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आज त्यांनी गंभीर आरोप केले. 'मी आता सागर बंगल्यावर येतो. तुम्ही माझा बळी घ्या, पण खोटे आरोप करू नका', असं म्हणत मनोज जरांगे उठून जाऊ लागले त्यावेळी जमलेल्या मराठा समाजाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शांत होत नव्हते आणि एकच गोंधळ उडाला.


मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसमधून आरक्षण मिळू नयेत यासाठी फडणवीस यांच्याकडून षडयंत्र सुरु आहे. त्यांच्याकडून मला फसवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. माझा बळी घायचा असेल तर मी स्वतःच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो. फडणवीस यांना आयुष्यातून उठवून टाकील असंही जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे व्यासपीठावरून उठून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले, मात्र मध्येच त्यांना भोवळ आली.


मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे यांना भोवळ आल्याने काही अंतरावर ते थांबले. गावकऱ्यांनी त्यांना रुमालने हवा देण्याचा प्रयत्न केला. तसेच तुमची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तुम्ही पायी चालू नका अशी विनंती गावकरी करत आहेत. सध्या आंतरवालीत मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु आहे.



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी या प्रकारावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. जरांगे काय बोलले ते मी ऐकलं नाही, असं ते म्हणाले.



भाजपा आमदार नितेश राणे यांचा जरांगेंना इशारा


'सागर बंगल्यावर येण्याआधी मध्ये एक मोठी भिंत आहे. ती पार करावी लागेल. आणि ती भिंत आम्ही आहोत', असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मनोज जरांगेंना दिला आहे. "आमच्या सरकारनं १० टक्के आरक्षण दिलं असून, मराठा समाजानं ते स्वीकारलं आहे. जरांगे-पाटलांचं समाधान होत नसल्यानं ते फडणवीसांवर टीका करत आहेत. तर आम्ही मराठेही येथे उभे आहोत," असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Weather Update : पावसाची धडाकेबाज एंट्री! कोकण-घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, मराठवाडा-विदर्भात सतर्कतेचा इशारा, IMD ने दिली माहिती...

मुंबई : यंदाचा ऑगस्ट महिना महाराष्ट्रासह देशासाठी पावसाळी ठरला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तर हा पाऊस

गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद! कोणत्या तारखांना बंदी?

जुन्नर: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे शहर

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर मराठा आंदोलकांकडून मारहाणीचा प्रयत्न! कुठे घडली घटना? वाचा नेमके काय घडले

पुरंदर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या विरोधात पुरंदर येथे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात

पुरामुळे पिकं झाले उद्ध्वस्त, वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, हृदयद्रावक Video Viral

लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी

'गोकुळ'ने दूध खरेदी किंमत आणि छोट्या डेअरींसाठीच्या अनुदानात केली वाढ

कोल्हापूर: गोकुळ डेअरी किंवा गोकुळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने