'बाबा म्हणतात' कविता आणि काव्यकोडी


  • कविता : एकनाथ आव्हाड 


बाबा म्हणतात...


बाबा म्हणतात, क्रियापदावरून
समजतो उद्देश-हेतू
क्रियापदाचे अर्थ यातून
बाळा जाणून घे तू...

इकडे या, तिकडे जा
बचत करा, बचत करा
क्रियापदाचा अर्थ यातला
अज्ञार्थीच आहे खरा...

जर वाचाल, तर वाचाल
जो करेल, तो भरेल
क्रियापदावरून संकेतार्थ
यातून बघ तुला कळेल...

वाऱ्याची गार झुळुक यावी
वडीलधाऱ्यांचा मान राखावा
क्रियापदावरून विद्यार्थाचा
अर्थ यातून समजावा...

मुले-बाळे मनमुराद हसली
गुरे-वासरे ओलीचिंब झाली
क्रियापदावरून स्वार्थाची
अर्थच्छटा कळून आली...

बाबांच्या बोलण्यातून मला वाक्याचा उद्देश कळतो
क्रियापदाचा अर्थ त्यातून
अचूक ओळखून घेतो...

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड


१) भारतीय गाणकोकिळा
क्वीन ऑफ मेलडी
छत्तीसपेक्षा जास्त भाषांमध्ये
गाणी त्यांनी गायिली...

दादासाहेब फाळके, भारतरत्न
पुरस्काराने गौरविले
आनंदघन नावाने
कोण संगीतकारही झाले?

२) पहिले भारतीय वैमानिक
त्यांनाच मानले जाते
भारतीय विज्ञान वाहतूक
उद्योगाचे जनकच ते...

टाटा समाज विज्ञानसंस्था
त्यांनीच केली स्थापन
भारतरत्न पुरस्काराचे
सांगा मानकरी कोण?

३) भारतीय कायदेपंडित
धर्मशास्त्राचे अभ्यासक
भारतरत्न पुरस्कारासह
सन्मान लाभले कैक...

‘धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक
इतिहास’ ग्रंथ रचिला
महामहोपाध्याय या पदवीचा
मान कोणास मिळाला?
उत्तरे : 

१) लता मंगेशकर

२) जे. आर. डी. टाटा 

३) पांडुरंग वामन काणे 
Comments
Add Comment

इच्छेला प्रयत्नांची जोड हवीच

शिल्पा अष्टमकर: गोष्ट लहान, अर्थ महान माणसाच्या जीवनात इच्छा असणे ही पहिली पायरी आहे, पण केवळ इच्छा असून चालत

संस्कारक्षम मन

प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ शाळेचे अनेक उपक्रम असतात. अशाच एका उपक्रमात शाळेतल्या विद्यार्थ्यांना

चिंगी मुंगी...

कथा: रमेश तांबे एक होती मुंगी नाव तिचं चिंगी एकदा काय झालं चिंगी खूपच दमली पळून पळून खरेच थकली मग तिने

सायंकाळी आकाश रंगीबेरंगी कसे दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील  रोजच्याप्रमाणे सीता व नीता सायंकाळी या शाळेतून घरी आल्या. आपला गृहपाठ आटोपून मावशीला

विशाल मुंबई शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श विद्यालय

दि विशाल मुंबई शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. भाऊ राणे, लक्ष्मण आर. प्रभू, विश्वनाथ

सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर, सीनिअर (नाईट) कॉलेज (कामोठे)

कै. बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना जून २००५ मध्ये करण्यात आली. कामोठे वसाहतीतील व ग्रामीण