मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) दृष्टीने सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. त्यात भाजपाचा (BJP) प्रभाव अधिक असल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र, ज्या जागांमध्ये भाजपाचा प्रभाव कमी आहे, अशा ठिकाणी विशेष लक्ष देण्यास भाजपाने सुरुवात केली आहे. त्यात दक्षिण मुंबईचा (South Mumbai) समावेश आहे. विशेष म्हणजे दक्षिण मुंबईतून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना आदेश देण्यात आले आहेत. राहुल नार्वेकर हे लोकसभा निवडणुकीचा नारळ आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) बालेकिल्ल्यात म्हणजेच वरळीत फोडणार आहेत.
उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी अशा तिन्ही प्रकारातील मतदारांचा राहुल नार्वेकर यांना अनुभव आहे. कोकणी आणि मराठी चेहरा असल्याने त्यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. सध्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. अरविंद सावंतांविरोधात आता नार्वेकर मैदानात उतरणार आहेत.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्याकडून लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरु आहे. ते आजच प्रचाराला सुरुवात करणार आहेत. आज नार्वेकर यांचा वरळी विधानसभेत दोन दिवसीय वार्ड निहाय दौरा नियोजित आहे. ते वरळीत आज सकाळी ११ वाजता वॉर्ड क्रमांक १९३ ला भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी ११:४० वाजता वॉर्ड क्रमांक १९६ कार्यालयास भेट देणार आहेत. दुपारी १२:२० वाजता वॉर्ड क्रमांक १९५ ला नार्वेकर यांची भेट असेल. याशिवाय ते स्थानिक नागरिकांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर वॉर्डातील भाजपच्या प्रमुख पदाधिकांऱ्यांसोबत ते संवाद साधतील.
लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाकडे असलेल्या वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघाकडे भाजपने विशेष भर दिला आहे. ठाकरे गटाची मते वळवण्यासाठी भाजप मराठीचा मुद्दा घेऊन चालणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची देखील साथ घेण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मनसेच्या साथीने मराठी मते स्वतःकडे वळवण्यास भाजपला मदत होईल. माझगाव, शिवडी, लालबाग परळ या ठिकाणी मनसेची असलेली ताकद जमेची बाजू आहे. बाळा नांदगावकर यांचा मराठी भागात असलेला प्रभाव याचीही भाजपला मदत होऊ शकते.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…