२०३६ मध्ये भारत ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटिक्समधून सर्वाधिक पदके जिंकेल : अदिले सुमारीवाला
अहमदाबाद : ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अदिले सुमारीवाला यांनी सांगितले की, २०३६ च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये (Olympics 2036) भारत ॲथलेटिक्समधून सर्वाधिक पदके जिंकेल. भारत २०३६ ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद भूषवत आहे आणि आमची तयारीही जोरात सुरू आहे.
अहमदाबादमधील आंतर जिल्हा ॲथलेटिक्स संमेलनाच्या वेळी सुमारीवाला यांनी ही माहिती दिली.
आमचे खेळाडू सीडब्लूजी आणि एशियाडमध्येही चांगली कामगिरी करत आहेत. आमच्याकडे वर्ल्ड चॅम्पियनशिपचे सुवर्णही आहे. आमच्याकडे जगातील टॉप ६ भालाफेकपटूंपैकी ३ आहेत. आम्ही थ्रो, रिले, जंप आणि वॉक रेस यासारख्या इव्हेंटची शॉर्टलिस्ट केली आहे. यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रित करत आहोत. या खेळांसाठी आमच्याकडे परदेशी प्रशिक्षक आहेत, जे खेळाडूंना सतत उच्चस्तरीय प्रशिक्षण देत आहेत, असे सुमारीवाला यांनी सांगितले.