Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटल्याने १५ जणांचा मृत्यू

ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटल्याने १५ जणांचा मृत्यू

लखनऊ : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात माघी पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटी होऊन भीषण दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने, ट्रॅक्टर थेट तलावात जाऊन पलटी झाला.

माघी पौर्णिमेनिमित्त ट्रॅक्टरमध्ये भरुन सर्व भाविक गंगा स्नानासाठी जात होते. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत ४० पेक्षा जास्त भाविक बसले होते. भरगच्च ट्रॉली थेट तलावात पलटी झाल्याने १५ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी आहेत.

दरम्यान जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. प्रशासनाने या घटनेची गंभीरतेने दखल घेतली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ८ महिला आणि ७ मुलांचा समावेश आहे. काही भाविकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -