Ayodhya: १० किलो सोने, २५ किलो चांदी, कोट्यांवधींचे दान

मुंबई: दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर २२ जानेवारी २०२४मध्ये अयोध्येत श्री रामांची प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हापासून अयोध्येत भक्तांची दरदिवसाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. २२ जानेवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत एक महिन्यात तब्बल ५५ ते ६० लोकांनी अयोध्येत राम मंदिराला भेट दिली.तसेच राम मंदिरात श्रीरामांच्या चरणी कोट्यावधीचे दान करण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार तब्बल इतक्या दिवसांमध्ये साधारण २५ कोटींचे दान श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यात आले. या धनराशीमध्ये राम भक्तांनी चेक, ड्राफ्ट आणि रकमेचा समावेश आहे. तर दागिने आणि रत्नांबाबत बोलायचे झाल्यास मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दान या ठिकाणी करण्यात आले आहे.


सोन्या, चांदीपासून बनवलेले मुकूट ते हार, छत्र, रथ, बांगडी, खेळणी, पैंजण, दीपक तसेच अगरबत्ती स्टँड, धनुषबाण, विविध प्रकारची भांडीसह अनेक साहित्य आले आहे. चांदीचबाबत बोलायचे झाल्यास २५ किलोहून अधिक चांदी आतापर्यंत भक्तांनी दान केली आहे. तर सोन्याबाबत बोलायचे झाल्यास अद्याप ठोस वजन समजलेले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार साधारण १० किलो सोने अर्पण केले असल्याचे बोलले जात आहे.



६० लाख भक्तांनी केले राम मंदिराचे दर्शन


श्री रामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून आतापर्यंत महिन्याभरात जवळपास ६० लाखाहून अधिक लोकांनी दर्शन घेतले. ही संख्या वाढतच आहे.

Comments
Add Comment

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७