Ayodhya: १० किलो सोने, २५ किलो चांदी, कोट्यांवधींचे दान

मुंबई: दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर २२ जानेवारी २०२४मध्ये अयोध्येत श्री रामांची प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हापासून अयोध्येत भक्तांची दरदिवसाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. २२ जानेवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत एक महिन्यात तब्बल ५५ ते ६० लोकांनी अयोध्येत राम मंदिराला भेट दिली.तसेच राम मंदिरात श्रीरामांच्या चरणी कोट्यावधीचे दान करण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार तब्बल इतक्या दिवसांमध्ये साधारण २५ कोटींचे दान श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यात आले. या धनराशीमध्ये राम भक्तांनी चेक, ड्राफ्ट आणि रकमेचा समावेश आहे. तर दागिने आणि रत्नांबाबत बोलायचे झाल्यास मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दान या ठिकाणी करण्यात आले आहे.


सोन्या, चांदीपासून बनवलेले मुकूट ते हार, छत्र, रथ, बांगडी, खेळणी, पैंजण, दीपक तसेच अगरबत्ती स्टँड, धनुषबाण, विविध प्रकारची भांडीसह अनेक साहित्य आले आहे. चांदीचबाबत बोलायचे झाल्यास २५ किलोहून अधिक चांदी आतापर्यंत भक्तांनी दान केली आहे. तर सोन्याबाबत बोलायचे झाल्यास अद्याप ठोस वजन समजलेले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार साधारण १० किलो सोने अर्पण केले असल्याचे बोलले जात आहे.



६० लाख भक्तांनी केले राम मंदिराचे दर्शन


श्री रामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून आतापर्यंत महिन्याभरात जवळपास ६० लाखाहून अधिक लोकांनी दर्शन घेतले. ही संख्या वाढतच आहे.

Comments
Add Comment

निर्यातक्षम राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर

नीती आयोगाच्या निर्यात निर्देशांकात तामिळनाडू मागे नवी दिल्ली : नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक -

गिफ्ट सिटीमध्ये १५ देशांच्या परकीय चलनांमध्ये करता येतात व्यवहार

भारतातील एक शहर जिथे रुपयांऐवजी वापरले जाते परकीय चलन नवी दिल्ली : आपल्याला भारतात कोठेही उद्योग करायचा असेल तर

मणिकर्णिका घाटावर बुलडोजर

दोन खासदारांसह अनेकांवर गुन्हा वाराणसी : वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

बदरी-केदारसह चारधाममध्ये मोबाईल बंदी ,प्रशासनाची रील आणि फोटोवर कडक नजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेची मर्यादा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी यावर्षी

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष

प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर 'गणेशोत्सवा'चा भव्य चित्ररथ नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : राजधानी नवी दिल्ली

भाजप हीच देशाची पहिली पसंती: पंतप्रधान मोदी

सुशासनासाठी जनतेचा विक्रमी जनादेश! देशाला आता केवळ विकास आणि 'गुड गव्हर्नन्स' हवा दिसपुर (वृत्तसंस्था): आज भाजप