Ayodhya: १० किलो सोने, २५ किलो चांदी, कोट्यांवधींचे दान

मुंबई: दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर २२ जानेवारी २०२४मध्ये अयोध्येत श्री रामांची प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हापासून अयोध्येत भक्तांची दरदिवसाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. २२ जानेवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत एक महिन्यात तब्बल ५५ ते ६० लोकांनी अयोध्येत राम मंदिराला भेट दिली.तसेच राम मंदिरात श्रीरामांच्या चरणी कोट्यावधीचे दान करण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार तब्बल इतक्या दिवसांमध्ये साधारण २५ कोटींचे दान श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यात आले. या धनराशीमध्ये राम भक्तांनी चेक, ड्राफ्ट आणि रकमेचा समावेश आहे. तर दागिने आणि रत्नांबाबत बोलायचे झाल्यास मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दान या ठिकाणी करण्यात आले आहे.


सोन्या, चांदीपासून बनवलेले मुकूट ते हार, छत्र, रथ, बांगडी, खेळणी, पैंजण, दीपक तसेच अगरबत्ती स्टँड, धनुषबाण, विविध प्रकारची भांडीसह अनेक साहित्य आले आहे. चांदीचबाबत बोलायचे झाल्यास २५ किलोहून अधिक चांदी आतापर्यंत भक्तांनी दान केली आहे. तर सोन्याबाबत बोलायचे झाल्यास अद्याप ठोस वजन समजलेले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार साधारण १० किलो सोने अर्पण केले असल्याचे बोलले जात आहे.



६० लाख भक्तांनी केले राम मंदिराचे दर्शन


श्री रामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून आतापर्यंत महिन्याभरात जवळपास ६० लाखाहून अधिक लोकांनी दर्शन घेतले. ही संख्या वाढतच आहे.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१