जसप्रीत बुमराह रांचीला नाही पोहोचला, चौथ्या कसोटीसाठी काय आहे टीम इंडियाचा प्लान?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी रांचीला पोहोचले. रोहित शर्मा अँड कंपनी संध्याकाळी ४ वाजता बिरसा मुंडा एअरपोर्टवर पोहोचले तेव्हा एक गोष्ट पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या या क्रिकेटर्ससोबत जसप्रीत बुमराह नव्हता. केएल राहुलही संघासोबत नव्हता मात्र तो नंतर टीम इंडियासोबत येण्याची आशा आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. या कारणामुळे रांची कसोटी सामन्यात करो वा मरो या स्थितीत असणार आहे. भारतीय संघाला मालिकेत विजय मिळवायचा असेल तर त्यांना रांची कसोटी जिंकावी लागेल.


भारत आणि इंग्लंडचे संघ प्रायव्हेट जेटने राजकोटमध्ये पोहोचले. यात खास बाब म्हणजे जसप्रीत बुमराह संघासोबत नव्हता. असे मानले जात आहे की जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत आराम दिला जाऊ शकता.


भारतीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), जसप्रीत बुमराह(उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, केएस भरत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.glan

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी