Afghanistan Landslide: अफगाणिस्तानच्या नूरिस्तानमध्ये भूस्सखलन,२५ जणांचा मृत्यू

नूरिस्तान: अफगाणिस्तानच्या नूरिस्तान प्रांतात भूस्सखलन झाल्याने तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय नूरगाराम जिल्ह्यात भूस्सखलनामुळे साधारण १० जण जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. सूचना आणि संचार प्रमुख मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी या घटनेची माहिती देत सांगितले की नूरगाराम जिल्ह्याच्या नकराह गावांत जोरदार पावसामुळे अनेक डोंगर कोसळले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे १५ ते २० घरांचे नुकसान झाले आहे.


 


पावसामुळे नूरिस्तान, कुनार आणि पंजशीर प्रांतातील रस्ते खचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंजशीर प्रांतात हिमस्सखलन झाले आहे. यामुळे ५ कर्मचारी बेपत्ता झाले आहेत.


पंजशीरच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी २ जणांचा आधीच मृत्यू झाा आहे. अफगाणिस्तानात वारंवार भूस्सखलन तसेच हिमस्सखलनाच्या घटना घडत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जिवित तसेच वित्तहानी होत आहे.


नैसर्गिक आपत्तीशिवाय लडखडणारी अर्थव्यवस्थाही चिंतेचा विषय बनला आहे. येथील नागरिकांना आपली गुजराण करण्यात अनेक समस्या येत आहे.

Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात