IND vs ENG: यशस्वी जायसवालने राजकोटमध्ये केली धमाल

मुंबई: भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जायसवालने आपल्या जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले. यशस्वीने भारताच्या दुसऱ्या डावात नाबाद २१४ धावा केल्या. यशस्वी या दरम्यान २३६ बॉलचा सामना केला. यात १४ चौकार आणि १२ षटकार ठोकले.



गांगुलीने याबाबतीत पछाडले


यशस्वी जायसवालने या खेळी दरम्यान रेकॉर्ड्स बनवले. यशस्वी जायसवालने कसोटीत दुहेरी शतक ठोकले. याआधी विनोद कांबळीला अशी कामगिरी साधता आली होती. विराट कोहलीनेही सलग दोन सामन्यांत दुहेरी शतक ठोकले होते.


यशस्वी माजी कर्णधार विराट कोहली आणि वीनू मांकडनंतर कसोटी मालिकेतील एकाहून अधिक दुहेरी शतक ठोकणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यशस्वीने विशाखापट्टणम येथील कसोटी सामन्यात २०९ धावांची खेळी केली होती. यशस्वी जायसवालने सध्याच्या कसोटी मालिकेत ५४५ धावा केल्या आहेत. यशस्वीने सौरव गांगुलीला मागे टाकले. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या २००७च्या मालिकेत ५३४ धावा केल्या होत्या.



भारतासाठी एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा


५४५ यशस्वी जायसवाल विरुद्ध इंग्लंड २०२४
५३४ सौरव गांगुली विरुद्ध पाकिस्तान २००७
४६३ गौतम गंभीर विरुद्ध ऑस्ट्रेलिया २००८
४४५ गौतम गंभीर विरुद्ध न्यूझीलंड २००९

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत