‘ढसाळ’ नावाचा झंझावात पडद्यावर!

ऐकलंत का!: दीपक परब


पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशीत आणि अन्यायाने पिडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पँथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. त्यांचे जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल. महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात दलित पँथरने एक राजकीय व सामाजिक वादळ तयार केले होते. द बायोस्कोप फिल्म्सने बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबीयांकडून अधिकृतपणे घेतले असून सखोल संशोधन आणि अभ्यासांती हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यासाठी सज्ज होत आहे. त्यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करण्याचे हे आव्हान पेलले आहे संजय पांडे यांनी. ढसाळ यांच्या सर्व देश-विदेशातील चाहत्यांसाठी ही पर्वणी असणार आहे.


संजय पांडे निर्मित, वरुणा राणा लिखित आणि दिग्दर्शित, प्रताप गंगावणे यांच्या संवादांसह या बायोपिकमध्ये ढसाळ यांच्या अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होऊन २०२५ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ढसाळ यांचे जीवन अशीच एक ज्वलंतकथा आहे. खेडेगावातील महारवाड्यात जन्मलेल्या, मुंबईतील कामाठीपुरा येथे बालपण गेलेल्या ढसाळांनी जागतिक पातळीवर आपल्या कवितेचा ठसा उमटविला. त्यांनी उभारलेली कट्टर दलित पँथर चळवळ व बंडखोर कवितांमधून त्यांनी दलित आणि गरिबांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. जातीच्या फिल्टरशिवाय त्यांचे विचार हे सर्व समाजाच्या अंतःकरणाला थेट भिडू शकतात कारण हे विचार कालातीत आहेत. ढसाळ हे व्यक्तीपेक्षा एक शक्तिशाली, प्रक्षोभक असा विचार होता आणि हा विचार आव्हानात्मक असल्याने तो तमाम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्याला प्राधान्य दिले असल्याचे लेखिका आणि दिग्दर्शिका वरुणा राणा यांनी सांगितले.


नामदेव यांचा १५ फेब्रुवारी हा जन्मदिवस आणि ढसाळ नावाचा झंझावात शांत झाल्याला १० वर्षे झाली. नामदेवचा समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन व माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला ‘ढसाळ’ चित्रपटातून दिसतील. या चित्रपटात ढसाळ यांच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, राजकारण, पूर्ण दलित पँथरची दहशत असलेली चळवळ असा सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. हा बायोपिक एक महत्त्वाचा ऐतिहासिक ‘बखरनामाच’ आहे, अशी प्रतिक्रिया ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

भुकेलेल्यांना अन्न न दिल्यास...

महाभारतातील मोतीकण ; भालचंद्र ठोंबरे पद्म पुराणातील एका कथेनुसार, वनवासात असताना प्रभू श्रीराम एकदा अगस्ती

चिरतरुण...

संवाद ; गुरुनाथ तेंडुलकर अलीकडेच मी एक व्हिडीओ पुन्हा एकदा नव्याने पाहिला. जग‌द्विख्यात गायिका आशा भोसले

‘रूक जा रात, ठहर जा रे चंदा...’

नॉस्टॅल्जिया ; श्रीनिवास बेलसरे पूर्वी अनेक सिनेमा असे निघाले की त्यांनी प्रेक्षकांना ढसढसा रडवले होते. त्याची

धीर धरी...

आनंदी पालकत्व ; डाॅ. स्वाती गानू टीनएजर्स मुलांना संयम कसा शिकवाल? संयम हा एक चांगला गुण आहे, मात्र तो जन्मतःच

आत्मप्रतिष्ठेचं भान

स्मृतिपटल; अनिल तोरणे कोणत्याही गोष्टीचा कैफ प्रमाणाबाहेर चढणे केव्हाही अनिष्टच ठरते. गतकाळातील एका

सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक

ग्राहक दिन ; स्नेहल नाडकर्णी माणसाचं समाधान वाढण्याऐवजी अपेक्षा वाढतात तेव्हा तो अधिक भौतिक सुखं मिळवण्याच्या