पंतप्रधान मोदी देणार कार्यकर्त्यांना विजयाचा महामंत्र

दिल्लीत होणार आज-उद्या भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी नेते आणि कार्यकर्त्यांना सज्ज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून (१७ फेब्रुवारी) दिल्लीत सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ३७० जागा तर एनडीएच्या ४०० जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देणार आहेत. रविवारी (१८ फेब्रुवारी) अधिवेशनाचा समारोप होणार आहे.


प्रगती मैदान भागातील भारत मंडपममध्ये होणाऱ्या अधिवेशनासाठी सर्व राष्ट्रीय आणि राज्यांमधील पदाधिकारी दिल्लीत पोहोचले आहेत. लोकसभा निवडणुकीची केव्हाही घोषणा होऊ शकते. भाजपने या निवडणुकीसाठी ३७० जागांचे तर एनडीए आघाडीसाठी ४०० जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठरविले आहे. त्यापार्श्वभूमीवर या अधिवेशनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात येणार आहे.


निवडणूकीच्या तोंडावर होणाऱ्या या राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून यानिमित्ताने संघटनात्मक शक्तीप्रदर्शन करण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा पदाधिकाऱ्यांना विजयाचा मंत्र देणार आहेत.


सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. निवडणुकीत उतरण्यापूर्वी पक्ष कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळे सर्व लहान-मोठ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. अधिवेशनाची सुरुवात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाने होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनाने अधिवेशनाचा समारोप होईल.


निर्धारित वेळेत प्रत्येक बूथपर्यंत ताकद पोहोचविण्याचे उद्दीष्ट भाजपने ठरविले असून मतदारांना साद घालण्यासाठी कोणते मुद्दे हाती घ्यावे याचा आराखडा पक्षनेतृत्वाने तयार केला आहे. हा आराखडा अधिवेशनात मांडला जाणार असल्याचे समजते. राम मंदिर उभारणी आणि भाजप सरकारच्या गेल्या दहा वर्षातील लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त प्रचार करण्याची आखणी पक्षाने केली आहे. यासोबतच, संलग्न संघटनांना देखील जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील