मुंबई: प्रसिद्ध टीव्ही शो महाभारतमध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज(Nitish Bharadwaj) आपल्या खाजगी आयुष्यात त्रस्त आहेत. ते आपली माजी पत्नी स्मिती घाटेविरोधात पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. त्यांनी आपल्या पत्नीवर मेंटल टॉर्चर करत असल्याचे आरोप केले आहेत.
नितीश यांचे पत्नीवर आरोप
नितीश यांनी बुधवारी भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणचारी मिश्र यांच्याकडून मदत माहितली. नितीश यांनी पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत लिहिले की स्मितसोबतच्या लग्नानंतर त्यांनी आणि त्यांची पत्नी स्मिताने २०१९मध्ये मुंबईच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केला आहे आणि हा अर्ज अद्याप प्रलंबित आहे.
मुलींना भेटू देत नाही पत्नी- नितीश भारद्वाज
यासोबतच त्यांनी आपल्या IAS पत्नी स्मितावर आरोप लावताना म्हटले की त्यांची पत्नी त्यांना आपल्या मुली देवयानी आणि शिवरंजनी यांना भेटू देत नाही तसेच बोलूही देत नाही. स्मिता यांनी त्यांच्या मुलींच्या शाळाही बदलत असते. यामुळेच नितीश यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत आहे.
नितीनश यांची दोन लग्ने
नितीश यांनी दोन लग्ने केली. मात्र एकही लग्न टिकले नाही. त्यांनी १९९१मध्ये पहिले लग्न केले होते. मोनिषा पाटीलसह त्यांनी आपले वैवाहिक जीवन सुरू केले होते मात्र २००५मध्ये हे लग्न तुटले. यानंतर नितीश यांनी स्मितासोबत लग्न केले. यांचे लग्न २००९मध्ये झाले होते. दोघांना जुळ्या मुली आहेत.