Poems and riddles : लखलखते उत्तर

कविता : एकनाथ आव्हाड


उठा मुला थांबून तुला
नाही चालणार
हातपाय गाळून
यश कसे रे मिळणार?

ठेचाळून पडला जरी
जो येतो वाटेवर
त्याच्यासाठी नव्या वाटा
होतात हजर...!

ध्यानात ठेव संकटात
नाही रडून चालत
धाडसाच्या मागे
यश येत असे धावत

या जगी नाही बरं
काहीच अशक्य
वाळवटी नंदनवन
फुलवणेसुद्धा शक्य

माणसाने आकाश
बघ घेतले कवेत
सागराचा तळही कसा
गाठला दमात

केल्याने होत आहे
याचे राहू दे रे भान
यश हे चिकाटीला
चिकटलेले जाण

श्रमाची बांधून पूजा
कर प्रयत्न सत्वर
निराशेच्या काळोखाला
दे लखलखते उत्तर!


काव्यकोडी : एकनाथ आव्हाड


१) शेतातून येतो
कारखान्यात जातो
साखर, गुळाचे
रूप नवे घेतो

उन्हाळ्यात रस याचा
लागतो भारी
काविळीवर सांगा बरं
कोण गुणकारी?

२) चौकोनी आकार
पांढराशुभ्र रंग
यांच्याकडे येते बघा
मुंग्यांची रांग

कडू बोलणे त्यांचे
कधीच नसते
चहात, मिठाईत
कोण लपून बसते?

३) दोन पंख, एक शेपटी
पाण्यात त्याचे घर
अंग असते खवल्यांचे
रंगीत नक्षी त्यावर

सुळकन पोहताना
दिसे किती छान
कुणामुळे पाणी
होत नाही घाण?

उत्तर -
१) ऊस
२) साखर 
३) मासा

Comments
Add Comment

वाचन गुरू

“काय रे अजय, सध्या पुस्तक वाचन अगदी जोरात सुरू आहे तुझं. हा एवढा बदल अचानक कसा काय घडलाय!” तसा अजय म्हणाला, “काही

अरोरा म्हणजे काय असते?

अरोरा म्हणजे तो ध्रुवांवर पडणारा तेजस्वी प्रकाश. त्याचे आकारही वेगवेगळे असतात. कधी प्रकाश शलाका असतात, तर कधी

आरामदायक क्षेत्र

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक गमतीशीर गोष्ट सांगते. उकळत्या पाण्यामध्ये बेडकाला टाकल्यावर तो क्षणात बाहेर

वृत्तपत्रांचे महत्व

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात माहिती, ज्ञान आणि घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी वृत्तपत्र

वृद्धाश्रम...

कथा : रमेश तांबे सुमती पाटील वय वर्षे सत्तर. वृद्धाश्रमातल्या नोंदवहीत नाव लिहिलं गेलं आणि भरल्या घरात राहणाऱ्या

सूर्य गार भागात का जात नाही ?

कथा : प्रा. देवबा पाटील दुपारच्या सुट्टीत सुभाष आल्यानंतर आदित्य मित्रमंडळाच्या व सुभाषच्या डबा खाता खाता