मला नेहमी हे जाणवतं की, जी मुलं ॲकॅडमिकली म्हणजेच शालेय, महाविद्यालयीन शिक्षणात बरीच मागे पडतात, त्यांच्याबाबत शिक्षक वैतागलेले असतात. वर्गात त्यांचा रेमेडोक्याचे, ढगोळे, नर्मदेतले गोटे असा उद्धार होत असतो. ही मुलं वर्गात फार अबोल असतात. आपण काही बोललो की ते चुकणारच. आपली अक्कल निघणार, मुलं जोरजोरात आरडाओरड करणार, मुली फिदी फिदी हसणार. आपल्याला खूप वाईट वाटणार, पण रडतासुद्धा येणार नाही. कितीही राग आला तरी त्या रागाला कोणी किंमत देणार नाही. या विचारांनीच खरं तर ते मिटून जातात. अशा मुलांना कोणी मित्र नसतात. ते खूप एकटे पडतात. शाळेची, अभ्यासाची, शिक्षकांची त्यांच्या मनात भीती बसते, वर्गात केवळ मुले-मुली नव्हेत, तर शिक्षकही त्यांना बुली करतात. प्रोगेस कार्ड, पॅरेन्टस टीचर्स मीटिंग ही तर त्यांच्यासाठी मोठी संकटं असतात.
मुलं मनातल्या मनात तुटत जातात, जखमी होतात. स्वतःला काही करता येईल, याचा विश्वासच गमावून बसतात. सतत आपल्यात काहीतरी कमी आहे ही भावना त्यांना प्रगती करू देत नाही. जे त्यांना कळत नाही, जमत नाही, लक्षात राहत नाही ते त्यांना का करावंसं वाटेल? कशी इच्छा होईल. जी गोष्ट आपल्याला येत नाही ती करण्यासाठी तुम्ही त्यांना कितीही प्रेशराईज केलं तरी ते अशा मुलांना जमत नाही. नापास होणं, लाल रेघ किंवा काठावर पास होणं हे भाग्य आपण कपाळी घेऊन आलेलो आहोत असं ते मान्यच करून घेतात. उरलेलं काम पालक, शिक्षक आणि नातेवाईक, समाजातील शहाणे लोक टोमणे मारून पूर्ण करतात. मला वाटतं बिचारी म्हणून त्यांची कीव करण्यापेक्षा किंवा त्यांना स्लो लर्नर म्हणण्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे हे समजलं, तर हे आईस ब्रेकिंग खूप सक्सेसफूल होईल.
त्यांना लेबलिंग करणं, शिक्के मारणं सहानुभूती दाखवणं हे या प्रश्नाचं उत्तर नाही. सर्वसामान्य मुलांकडून अभ्यास करून घेणं हे एक आव्हानच असतं हे खरंय पण मग हे करायचं कसं? तर…
मी माझ्या शाळेत वर्गशिक्षक, मुख्याध्यापक होते, तेव्हा हुशार मुलांशी बोलून विशेषतः गणित, इंग्रजीच्या तासांकरिता त्यांच्या शेजारी ही मुले बसतील अशी व्यवस्था केली होती. तसंच मोठ्या वर्गात, तर शाळा सुटल्यावर किंवा ऑफ तासांना मागे पडणाऱ्या मुलांना हुशार मुले चक्क वर्गात या मुलांचा एक-एक टाॅपिक तयार करून घ्यायची.
ही मुलं इनकाॅम्पिटन्ट नसतात. मात्र ते पुरेसं हार्ड वर्क करत नाहीत म्हणून ते मागे पडतात असं आपल्याला वाटतं. खरं म्हणजे तुमच्या मदतीमुळे त्यांचं आयुष्य सोपं होतं. मुलं का मागे पडतात? काय कारणं याची, तर…
१) डेव्हलपमेंटल कारणे –
ही मुलं डेव्हलपमेंटच्या माइलस्टोनबाबत मागे पडतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, प्रत्येक मुलाची एक गती असते कन्सेप्ट, अभ्यास समजून घेण्याची. काहींची जलद तर काही स्वतःचा असा वेळ घेतात. हे डम्ब नसतात. पण त्यांना खूप वेळेस घटवून घ्यावं लागतं. यांची स्मरणशक्ती कमजोर, बोलणं सुरू व्हायला उशीर, लर्निंग डिसऑर्डर असू शकतात.
२) सोशल कारणे –
इंटरॲक्शन ही मुलं टाळतात, कारण ते पीआर ग्रुपशी कनेक्ट करण्यात यशस्वी होत नाहीत. रिझर्व्ह, शांत राहतात.
३) पर्सनल कारणे –
ही मुलं आपल्या राग, ताण, काळजी, निराशा या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होतात. आत्मविश्वास गमावून बसतात. यांचा सेल्फ एस्टीम, काॅन्फिडन्स, इमोशनल इन्स्टेबिलिटी हा मुख्य प्रश्न असतो.
४) एज्युकेशनल कारणे –
त्यांना वर्गात जे शिकवले जाते ते प्रोसेस करायला, समजून घ्यायला वेळ लागतो.
असं का होतं?
जर मुलं नैसर्गिक, शारीरिक, मानसिक, भावनिक संकटातून गेली असली किंवा प्रीमॅच्युअर बर्थ, ब्रेन, नर्व्हस सिस्टीम डिसीज, ओव्हर पॅम्परिंगमुळेही हे होते.
या मुलांना कशी मदत करायची, तर…
मोटिव्हेशन देऊन, रिवॉर्ड देऊन, छोटी टार्गेट्स ठरवून, शिक्षक, केअर गिव्हर, पार्टनर यांच्याशी बोलून, रिअलिस्टिक अपेक्षा ठेवून खूप मदत होते.
त्यांच्या डोळ्यांसमोर तक्ते, कॅलेंडर, नोट्स, रिमांयडर्स, ऑडिओ, व्हिज्युअल गोष्टी वापरण्यासाठी असल्या, तर त्यांना प्रेरणा मिळेल आणि तेही प्रगतीची वाट हळूहळू पण योग्य दिशेने नक्कीच चालू लागतील.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…