Balu More Firing Case : तीन दिवसांपूर्वी गोळीबार झालेल्या भाजप माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कार्यालयात घुसून ५ जणांनी केला होता अंदाधुंद गोळीबार


जळगाव : राज्यात सध्या सर्रास गोळीबार (Firing case) करत हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारीच्या अनेक खळबळजक घटना समोर येत असल्याने नागरिकांकडून पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच तीन दिवसांपूर्वी चाळीसगावमधून (Chalisgaon) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. भाजपचे चाळीसगाव येथील नगरसेवक बाळू मोरे (Balu More) यांच्या कार्यालयात घुसून ५ जणांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यानंतर बाळू मोरे यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


जळगावच्या चाळीसगावात भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी हनुमान वाडी या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. अज्ञात तरुण चेहऱ्याला मास्क लावून आले होते. या संपूर्ण प्रकाराचे दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यानंतर बाळू मोरे यांची प्रकृती गंभीर होती. याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.


या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर चाळीसगाव भागात सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलीस आरोपींचा शोध घेत असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. शरद मोहेळ, महेश गायकवाड, अभिषेक घोसाळकर, बाळू मोरे यासारख्या एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे, तसेच पोलिंसावर विश्वास ठेवायचा कसा? असा सवाल उपस्थित करत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये