Balu More Firing Case : तीन दिवसांपूर्वी गोळीबार झालेल्या भाजप माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Share

कार्यालयात घुसून ५ जणांनी केला होता अंदाधुंद गोळीबार

जळगाव : राज्यात सध्या सर्रास गोळीबार (Firing case) करत हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारीच्या अनेक खळबळजक घटना समोर येत असल्याने नागरिकांकडून पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच तीन दिवसांपूर्वी चाळीसगावमधून (Chalisgaon) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. भाजपचे चाळीसगाव येथील नगरसेवक बाळू मोरे (Balu More) यांच्या कार्यालयात घुसून ५ जणांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यानंतर बाळू मोरे यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जळगावच्या चाळीसगावात भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी हनुमान वाडी या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. अज्ञात तरुण चेहऱ्याला मास्क लावून आले होते. या संपूर्ण प्रकाराचे दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यानंतर बाळू मोरे यांची प्रकृती गंभीर होती. याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर चाळीसगाव भागात सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलीस आरोपींचा शोध घेत असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. शरद मोहेळ, महेश गायकवाड, अभिषेक घोसाळकर, बाळू मोरे यासारख्या एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे, तसेच पोलिंसावर विश्वास ठेवायचा कसा? असा सवाल उपस्थित करत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Recent Posts

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

34 mins ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

56 mins ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

2 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

3 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

3 hours ago

प्रहार बुलेटीन: ०५ जुलै २०२४

दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…

5 hours ago