Balu More Firing Case : तीन दिवसांपूर्वी गोळीबार झालेल्या भाजप माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

  265

कार्यालयात घुसून ५ जणांनी केला होता अंदाधुंद गोळीबार


जळगाव : राज्यात सध्या सर्रास गोळीबार (Firing case) करत हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारीच्या अनेक खळबळजक घटना समोर येत असल्याने नागरिकांकडून पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच तीन दिवसांपूर्वी चाळीसगावमधून (Chalisgaon) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. भाजपचे चाळीसगाव येथील नगरसेवक बाळू मोरे (Balu More) यांच्या कार्यालयात घुसून ५ जणांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यानंतर बाळू मोरे यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


जळगावच्या चाळीसगावात भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी हनुमान वाडी या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. अज्ञात तरुण चेहऱ्याला मास्क लावून आले होते. या संपूर्ण प्रकाराचे दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यानंतर बाळू मोरे यांची प्रकृती गंभीर होती. याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.


या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर चाळीसगाव भागात सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलीस आरोपींचा शोध घेत असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. शरद मोहेळ, महेश गायकवाड, अभिषेक घोसाळकर, बाळू मोरे यासारख्या एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे, तसेच पोलिंसावर विश्वास ठेवायचा कसा? असा सवाल उपस्थित करत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या