देशात वर्षाला १ कोटीहून अधिक कमाई करणाऱ्या टॅक्सपेयर्सच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली: भारतात वर्षाला एक कोटी रूपयाहून अधिक कमाई करणाऱ्या टॅक्सपेयर्सच्या(taxpaIyers) संख्येत चांगली वाढ पाहायला मिळाली आहे. ही संख्ये असेसमेंट वर्ष २०२३-२४मध्ये २.१६ लाखापर्यंत पोहोचली आहे. अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत ही माहिती दिली. अर्थ राज्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ नंतर महत्त्वपूर्ण वाढीसह मोठी कमाई करणाऱ्यांमध्ये एक पॉझिटिव्ह ट्रेंड पाहायला मिळत आहे.



स्वतंत्र इन्कम टॅक्स कलेक्शनमध्ये साल दर साल २७.६ टक्के वाढ


स्वतंत्र इन्कम टॅक्स कलेक्शनमध्ये साल दर साल २७.६ टक्के वाढ पाहायला मिळाली आणि अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी याचे श्रेय टॅक्स रिफॉर्म आणि देशाची आर्थिक विकासाच्या चांगल्या गतीला दिले आहे. तसेच प्रोफेशन इनकम रिपोर्टिंगमध्येही वाढ पाहायला मिळाल्याचे संसदेत सांगण्यात आले.


दरवर्षी १ कोटीहून अधिक पगार घेणाऱ्या टॅक्सपर्यंसची संख्या वाढली आहे. अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत बजेट सत्रादरम्यान सांगितले, नव्या आकडेवारीनुसार ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वर्ष २०२३-२४ साठी ही संख्या २.१६ लाखाहून अधिक झाली आहे.



देशात आयकर रिटर्न देणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ


अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की साल दर साल आधारवर देशात आयकर रिटर्न देणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली. यातील एक कोटीहून अधिक कमाई करणाऱ्या टॅक्स पेयर्सचा आकडा मोठ्या गतीने वाढत आहे. हा आकडा असेसमेंट वर्ष २०१९-२० मध्ये १.०९ लाख कोटी रूपये इतका होता. तर २०२२-२३मध्ये ही संख्या १.८७ लाखावर पोहोचली.


२६ ऑक्टोबर २०२३ च्या आकडेवारीनुसार सध्याचे आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ७.४१ कोटी टॅक्सपेयर्सने आयकर रिटर्न दाखल केला. यात ५३ लाख असे टॅक्सपेयर्स आहेत ज्यांनी पहिल्यांदा इन्कम टॅक्स दाखल केला.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव