Harda Blast: फटाका कंपनी स्फोट, मालकासह तीन आरोपी अटकेत

भोपाळ: मध्य प्रदेशच्या हरदा फटाका कंपनीत झालेल्या स्फोटाप्रकरणी तीन जणांना अटक कऱण्यात आली आहे. मुख्य आरोपीलाही अटक कऱण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजेश अग्रवाल, सोमेश अग्रवाल आणि रफीक खान यांचा समावेश आहे. राजेश अग्रवालला राजगढ जिल्ह्याच्या सारंगपूर येथून अटक करण्यात आली. तर कारमध्ये बसून दिल्लीला फरार होण्याच्या प्रयत्नात होते. हरदा कंपनीत झालेल्या स्फोटात तब्बल ११ लोक मारले गेले तर १७५ जण जखमी झाले.


हरदा अवैध फटाका कंपनीचे संचालक राजीव अग्रवाल आणि त्याच्या मुलाला सारंगपूर येथून अटक करण्यात आली. आरोपी घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत होते. राजेश अग्रवाल उज्जैन येथून दिल्लीला निघाले होते. सोबतच सोमेश अग्रवाल होते. ते मध्य प्रदेश सोडून दिल्लीला जात होते.



अटकेनंतर आरोपीलांना हरदाला पाठवले


सारंगपूर एसडीओपी अरविंद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश-उत्तर प्रदेश आणि दिल्लीला जोडणाऱ्या नॅशनल हायवेवर सारंगपूर पोलिसांनी रात्री ९ वाजता राजीव अग्रवाल, सोमेश अग्रवाल आणि रफीक यांना अटक केली. कागदोपत्री कारवाईसाठी आरोपींना हरदाला पाठवण्यात आले आहे. हरदा स्फोटाप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४, ३०८, ३४ तसेच कलम ३ स्फोट अधिनियमाच्या अंतर्गत तीन आरोपींना अटक केली.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या