नवी मुंबईतील ४५०० अनधिकृत बांधकामांवर महापालिका चालवणार बुलडोझर

Share

३१ डिसेंबर २०१५ पूर्वी बेकायदा बांधकामांच्या सर्वेक्षणाचे उच्च न्यायालयाचे आदेश

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. नेरुळ सेक्टर १६ मधील पार्क प्लॉटवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारती पाडण्याचे काम नुकतेच नमुंमपाकडून करण्यात आले आहे. २०१५ नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कायदेशीर कारवाई करता यावी यासाठी ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी आणि नंतर किती बेकायदा बांधकामे झाली आहेत, याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत.

नवी मुंबईत सुमारे ४५०० अनधिकृत बांधकामे असून ती पुन्हा एकदा पाडण्यात येणार असल्याची आणि शहरातील बेकायदा बांधकामांबाबत नोटीस बजावल्या ३२ दिवसात ही बांधकामे हटवली नाहीत, तर ती पाडण्याचे काम पालिका करेल अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी दिली आहे.

यासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी बांधकाम परवानगीशिवाय पूर्ण झालेली बेकायदा बांधकामे तसेच नवी मुंबईत सुरू असलेल्या काही बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. किशोर शेट्टी यांनी नवी मुंबई शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने महापालिकेला ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी नमुंमपाकडे किती अर्ज सादर करण्यात आले आहेत याचा तपशील देण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून, महापालिकेने सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.

महापालिका कार्यालयातील बेकायदा बांधकामांबाबत विचारणा केली असता, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिका विभागाचे अधिनियम १९६६ च्या कलम ५३, ५४ अंतर्गत ४ हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे आहेत. किती बांधकामे झाली, किती बेकायदा इमारती सुरू आहेत, याची माहिती पालिकेला मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बेलापूरपासून दिघापर्यंत अनेक मूळ गावे आहेत. तर गावठाण विस्तार परिसरात हजारो बेकायदा बांधकामे आहेत. या गावांच्या आसपास उभ्या राहिलेल्या बेकायदा इमारतींमधील घरे इतर ठिकाणच्या घरांपेक्षा स्वस्त आहेत. याशिवाय भूमाफिया आणि बेकायदा बांधकाम व्यावसायिकांनी शहरात अशा अनेक इमारती उभ्या केल्या असून, बेकायदा बांधकामांमुळे येथील गावांची प्रतिमाही मलीन होत आहे.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

1 hour ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

2 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

3 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

3 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

4 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

4 hours ago