Loksabha Election : निवडणूक प्रचारात लहान मुलं दिसली तर बालमजुरी कायद्यांतर्गत होणार कारवाई

काय आहे निवडणूक आयोगाचा नियम?


नवी दिल्ली : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी (Political Parties) कंबर कसली आहे तर निवडणुकीची तारीख जाहीर होताच जोरदार प्रचारालाही सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) प्रचारासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यात एक महत्त्वाचा नियम आखून देण्यात आला आहे. या नियमानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लहान मुलांचा प्रचाराच्या कामांसाठी वापर करता येणार नाही. तसे आढळल्यास बालमजुरी (Child Labor) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.


आज निवडणूक आयोगाने एक पत्रक जारी केले. यात लहान मुले आणि अल्पवयीन मुलांना निवडणूक प्रचारात सहभागी न करण्याच्या कडक सूचना जारी केल्या आहेत. लहान मुले किंवा अल्पवयीनांनी प्रचार पत्रिका वाटताना, पोस्टर्स चिकटवताना, घोषणाबाजी करताना किंवा पक्षाचे झेंडे आणि बॅनर घेऊन फिरताना दिसू नये, असे यात सांगण्यात आले आहे.


निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, मुलांना निवडणुकीशी संबंधित कामात किंवा निवडणूक प्रचाराच्या कामात सहभागी करुन घेणे खपवून घेतले जाणार नाही. या सूचनांमध्ये लहान मुलांना कोणत्याही प्रकारच्या राजकीय प्रचारात, मग ते कविता वाचणं, गाणी, घोषणा इत्यादींमध्ये सामील न करण्यास सांगितले आहे.


आयोगाने म्हटले की, कोणत्याही पक्षाच्या निवडणूक प्रचारामध्ये मुलांचा सहभाग असल्याचे आढळले, तर बालमजुरीशी संबंधित सर्व कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. याबाबत कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी व रिटर्निंग अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दरम्यान, मुलगा त्याच्या पालकांसोबत तिथे असेल, तर याला मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन मानले जाणार नाही.


Comments
Add Comment

Airport Rules: एअरपोर्टवर Reels आणि Selfie काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना; नियम मोडल्यास होऊ शकते कारवाई

सोशल मीडियाच्या (Social Media) वाढत्या वापरामुळे अनेक जण प्रवासादरम्यान सेल्फी, रील्स आणि व्हिडिओ तयार करताना दिसतात.

Two Eclipses In 15 Days : एकाच महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण; ऑगस्ट २०२६ मध्ये दुर्मिळ खगोलीय योग!

मुंबई : वैज्ञानिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन मोठ्या खगोलीय घटना ऑगस्ट २०२६ मध्ये

Bihar Hospital Fire : बिहारमधील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग; चार रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

बिहार : बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) (ICU) लागलेल्या भीषण

Delhi's Malviya Nagar Fire : दिल्लीतील अग्नितांडवात एकाच कुटुंबातील ८ जणांचा दुर्दैवी अंत

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील फ्लोरिश स्टे बी अँड बी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत

सरकारी नोकरी हवीय? मग 'ही' रेल्वे भरतीची संधी चुकवू नका

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) टेक्निशियन पदांसाठी मोठी

दिल्लीतील हॉटेलमध्ये भीषण आग; अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी एका हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये भीषण आग (Massive Fire)