अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताच्या उभारणीला चालना देईल : मुख्यमंत्री योगी

  42

लखनऊ (उत्तर प्रदेश वृत्त) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पाचे कौतुक करत, गाव, गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांसह समाजातील प्रत्येक घटकाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले. लखपती दीदी योजनेचे लक्ष्य ३ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याच्या आणि आशा भगिनींना आयुष्मान योजनेत आणण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री योगी यांनी स्वागत केले.


हा अंतरिम अर्थसंकल्प 'न्यू इंडिया'च्या समृद्धीची प्रतिज्ञा आहे, त्यात अंत्योदयाची दृष्टी आहे आणि १४० कोटी देशवासीयांची सेवा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री योगी म्हणाले.


मोदी सरकारने संसदेत सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीला चालना देणारा असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली १४० कोटी भारतीयांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांना अनुसरून विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल सीएम योगी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचेही आभार मानले.


मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 'सर्वांसाठी घरे' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने ग्रामीण भागात २ कोटी नवीन घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेमुळे गरिबांसाठी कायमस्वरूपी घरे उपलब्ध होतील. त्याचबरोबर तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधण्याचे उद्दिष्ट आणि ४० हजार रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय यामुळे येत्या काही वर्षांत औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री योगी म्हणाले की, अर्थसंकल्पात संरक्षण, कृषी, पायाभूत सुविधा, उद्योग, ऊर्जा, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प 'न्यू इंडिया'च्या समृद्धीची प्रतिज्ञा आहे, त्यात अंत्योदयाची दृष्टी आहे आणि १४० कोटी देशवासीयांची सेवा करण्याचे उद्दिष्ट आहे.

Comments
Add Comment

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे