IND vs ENG: दोघांच्या पदार्पणासह चार बदल निश्चित, दुसऱ्या कसोटीत अशी सेट होऊ शकते भारताची प्लेईंग ११

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ पहिला सामना गमावल्यानंतर या मालिकेत ०-१ने पिछाडीवर आहेत. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका १-१ बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सामना जिंकम्यासाठी टीम इंडियाला बेस्ट प्लेईंग इलेव्हनची गरज पडेल.



रजत पाटीदार आणि सरफराज खान यांचे पदार्पण निश्चित


रिप्लेसमेंट म्हणून दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात रजत पाटीदार आणि सरफराज खान यांचे पदार्पण निश्चित आहे. पाटीदार तिसऱ्या स्थानावर शुभमन गिलला रिप्लेस करू शकतो. गिल काही काळापासून कसोटीत खराब फॉर्मशी लढत आहे. तर हैदराबादमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत चौथ्या स्थानावर खेळणाऱ्या राहुलच्या अनुपस्थितीत सरफराज खानला त्याच स्थानावर संधी मिळू शकते.


पहिल्या कसोटीत भारतीय संघ जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसोबत मैदानात उतरला होता. माज्ञ सिराजला काही खास कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या सामन्यात पिचने स्पिनर्सला खूप मदत केली होती. अशातच रोहित शर्मा चार स्पिनर्सचा पर्याय निवडू शकतो.



इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी भारताचे संभाव्य प्लेईंग ११


रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, रजत पाटीदार, सफराज़ खान, श्रेयस अय्यर, केएस भरत, वाशिंगटन सुंदर, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

Comments
Add Comment

BCCI : आता दृष्टिहीन क्रिकेट संघाला मिळणार रॉयल ट्रीटमेंट; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय अंध क्रिकेट असोसिएशन (सीएबीआय) साठी एक योजना जाहीर केली आहे. या

T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या फॉर्मची काळजी करणाऱ्यांची मला काळजी वाटते : सूर्यकुमार यादव

आयसीसी टी२० २०२६ च्या विश्वचषकाचा गट टप्पा संपला असून आता सुपर ८ चा महत्वाचा टप्पा सुरु झाला आहे. या स्पर्धेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर

शिखर धवन दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने दुसऱ्यांदा लग्न केले. आयर्लंडच्या सोफी शाइनसोबत शिखर धवनने लग्न

सुपर एट फेरीतला पहिलाच सामना पावसामुळे रद्द

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली, सिडनी आणि अॅडलेडमध्ये भारताचा विजय

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका झाली. ही मालिका भारताने