Draupadi Murmu : भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था, १० वर्षांत २५ कोटी लोकांची गरिबी हटली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले मोदी सरकारचे कौतुक


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांसमोर केले संबोधित


नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या उद्या म्हणजे १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला औपचारिकपणे सुरुवात झाली असून या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी संसदेत अर्थसंकल्पासंदर्भात खासदारांना संबोधित केले. मागील वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले गेले आहे. भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. तसेच गेल्या १० वर्षात २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. यामुळे 25 कोटी लोकांची गरिबी दूर झाली असून देशातील उर्वरित लोकांसाठी हा आशेचा किरण असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले.


जम्मू-काश्मीरमधील आरक्षणामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले. कोणताही देश तेव्हाच प्रगती करतो जेव्हा तो तरुणांच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेतो असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारतातील लोकांना राम मंदिर उभारणीची वर्षानुवर्षे अपेक्षा होती आणि आता हे स्वप्न पूर्ण झाले आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या, मात्र, ते देखील हटवण्याचा निर्णय झाल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.


संसदेने तिहेरी तलाकविरोधात कायदा केला आहे. याच संसदेने शेजारी देशातून येणाऱ्या अत्याचारित नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा कायदा केला आहे. तसेच सरकारने मिशन मोडवर लाखो नोकऱ्या दिल्या आहेत. वन रँक वन पेन्शनची तरतूद केली आहे. भारतीय लष्करात प्रथमच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.



भारताची निर्यात वाढली


गेल्या १० वर्षांत आपण भारताला पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे. भारताची निर्यात सुमारे ४५० अब्ज डॉलरवरुन ७७५ बिलियन डॉलरपेक्षा जास्त झाली असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. एफडीआय पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची विक्री चार पटीने वाढली असल्याचा उल्लेख देखील राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला आहे.



आयकर भरणाऱ्यांची संख्या वाढली


दरम्यान, आयटीआर (Income tax return) भरणाऱ्यांची संख्या ३.१५ कोटींवरुन ८.१५ कोटी झाली आहे. ही वाढ दुप्पट आहे. दशकभरापूर्वी देशात केवळ काहीसे स्टार्टअप होते. जे आज एक लाखांहून अधिक झाले आहेत. वर्षभरापूर्वी ९४ हजार स्टार्टअपची नोंदणी झाली होती. जी गेल्या वर्षी १.६ लाख झाली आहे. जीएसटी भरणाऱ्यांची संख्या १.४ कोटींवर पोहोचली आहे.



१० वर्षात २१ कोटींहून अधिक वाहनांची खरेदी


गेल्या १० वर्षात देशातील जनतेने २१ कोटींहून अधिक वाहनांची खरेदी केली आहे. २०१४-१५ मध्ये २००० इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, तर २०२३-२४ मध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत १५ लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या दशकात सरकारने सुशासन आणि पारदर्शकता हा अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार बनवला आहे. ज्यामुळं भारताने मोठ्या आर्थिक सुधारणा केल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. गेल्या १० वर्षांत वित्तीय तूट नियंत्रणात आहे, तर परकीय चलनसाठा ६०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. भारताची बँकिंग व्यवस्था जगातील सर्वात मजबूत बँकिंग प्रणाली बनली आहे. भारतीय बँकांचा एनपीए पूर्वी दुहेरी अंकात होता, आता तो एक अंकावर आला आहे.



भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन निर्यातदार देश


भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन निर्यातदार देश झाला असल्याचा उल्लेख देखील राष्ट्रपतींनी यावेळी केला.

Comments
Add Comment

Indian Mango : नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातली? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; अफवांवर विश्वास ठेवू नका

नेपाळने भारतीय आंब्याच्या (Indian Mango) आयातीवर बंदी घातल्याची किंवा आयात स्थगित केल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये

India Breaks Silence On Gulf Conflict : भारताकडून आखाती प्रदेशात जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध, हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन

नवी दिल्ली : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दरम्यान, आखाती प्रदेशात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या

INDIAN RAILWAY : प्रवासी सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य; भारतीय रेल्वेकडून देशव्यापी अग्निसुरक्षा ऑडिटला सुरुवात

Navi Delhi : प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेने आता एका महत्त्वपूर्ण मोहिमेचे हाती घेतले आहे.

Guru Randhawa : धक्कादायक! गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा दावा; दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्ली : पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक  गुरु रंधावा (Guru Randhawa) यांच्या जिमबाहेर गोळीबार झाल्याची घटना

Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्ण माफ

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढत्या

Indian Navy : नौदलाला मिळणार प्रगत जीएनएसएस जॅमर, संरक्षण मंत्रालयाकडून ४४९ कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी