Loksabha Election Date : लोकसभा निवडणुका १६ एप्रिलला? व्हायरल पत्र खरं की खोटं?

मुंबई : सध्या सर्वच राजकीय पक्षांनी (Political parties) लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) कंबर कसली आहे. याचवर्षी या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तारखांबाबत मात्र घोळ आहे. सोशल मीडियावर (Social Media) लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला घेतली जाणार असल्याचं निवडणूक आयोगाचं (Election commission) एक पत्र व्हायरल होत आहे. मात्र, दुसरीकडे निवडणूक आयोगाने हे वृत्त फेटाळलं आहे.


निवडणूक आयोगाच्या तयारीसाठी ही तात्पुरती तारीख आहे. निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख यांचा आराखडा ठरवण्यासाठी १६ एप्रिल ही तारीख ठरवण्यात आल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. निवडणूक १६ एप्रिलला होणार याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या सीईओनी ही पोस्ट केली आहे. पत्रात देण्यात आलेली तारीख संदर्भासाठी आहे बाकी काहीही नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.


दिल्लीच्या सीईओ कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ‘२०२४ लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख १६ एप्रिल आहे. मात्र हे स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की, जाहीर करण्यात आलेली तारीख ही निवडणूक आयोगाला आराखडा आणि योजनेच्या तयारीसाठी संदर्भ म्हणून जाहीर करण्यात आली होती. आत्तापर्यंत निवडणुकीचा आराखडा नक्की झालेला नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


Comments
Add Comment

COVID-19 Variant : आंध्र प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाल्याची शक्यता, दोन मृत्यूंनी खळबळ

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२ नंतर पहिल्यांदाच

Madhya Pradesh : धार येथील भोजशाळा वाग्देवी मंदिरच, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुस्लिमांसाठी पर्यायी नमाजस्थळाची व्यवस्था करण्याचे निर्देश नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या धार येथील ऐतिहासिक

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला; लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

जम्मू : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात, एका विशेष एनआयए न्यायालयाने

Hormuz Strait Attack : होर्मुझ हल्ल्यात भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर भारताने इराणी दूतावासाला बजावले समन्स

नवी दिल्ली : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यात

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांचा जामीन कायम, सीबीआयची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने यांना मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद

Dhar Bhojshala supreme court : धार भोजशाळा वाद : 'प्रकरण अत्यंत संवेदनशील', अंतिम निकाल येईपर्यंत नमाजसाठी पर्यायी जागेची व्यवस्था - सर्वोच्च न्यायालय

मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाळा परिसराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण अंतरिम