फेब्रुवारीमध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ नका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला केंद्रीय मंत्र्यांना सल्ला


नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर काल म्हणजेच मंगळवारी पहिल्याच दिवशी नवं रेकॉर्ड बनले आहे. पहिल्याच दिवशीच मंदिरात ५ लाख भविकांनी दर्शन घेतले. मंदिराकडे जाणारा रामपथ भाविकांच्या गर्दीने पहाटेपासूनच ओसंडून वाहत होता. अयोध्येत वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना अयोध्येत न जाण्याचा सल्ला दिला आहे.


केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी (२४ जानेवारी) बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात न जाण्याचा सल्ला दिला आहे. अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्या झाल्यापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे व्हीआयपी नेते तिथे गेल्यास व्हीआयपी प्रोटोकॉलमुळे गर्दीत भर पडेल, परिणामी भाविकांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी गर्दीमुळे फेब्रुवारीमध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणे टाळावे, असे सर्व केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, मार्च महिन्यात केंद्रीय मंत्री राम मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहेत.


नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याबाबत बुधवारी मंत्रिमंडळाने आभार प्रस्ताव मंजूर केला. राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत जनतेला काय संदेश आहे, अशी विचारणा केली. सर्व मंत्र्यांनी पंतप्रधानांना जनतेच्या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या. यादरम्यान मंत्रिमंडळाने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

Comments
Add Comment

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज

एअरपोर्टवर विराटच्या भेटीला जमली 'विराट' गर्दी; चाहत्यांचा घेराव... सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

गुजरात : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे ११ जानेवारीला वडोदरा येथे खेळवला जाणारा आहे. या सामन्यापूर्वीच