Tata group : टाटा समूहाकडून अयोध्येत उभारलं जाणार हॉटेल; यूपीची होणार चांदी!

यूपीच्या वार्षिक उत्पन्नात होणार तब्बल 'इतकी' वाढ


अयोध्या : अयोध्येत काल राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) पार पडलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा (RamLalla Pran Pratistha) सोहळ्याला अनेक देशातील नामवंत उद्योगपतींनी आवर्जून हजेरी लावली होती. यावेळी राम मंदिराच्या निर्मितीमध्ये मोठा वाटा असलेल्या टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) देखील उपस्थित होते. मंदिराच्या निर्मितीनंतर आता टाटाच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (Tata Group IHCL) मोठी घोषणा केली आहे. कंपनीने उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात तिसरे हॉटेल उघडण्याचे कंत्राट जाहीर केले आहे.


टाटा समूहाकडून आता अयोध्या शहराचा चेहरामोहरा बदलवण्याचा प्रयत्न असून अयोध्येत एक मोठं हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये टाटा समूहाची दोन मोठी हॉटेल्स असून अयोध्येतील हे तिसरे हॉटेल असणार आहे. आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पुनित चटवाल ​​म्हणाले की, रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्या हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येत आहे. हे शहर जगभरातील पर्यटकांचा ओघ आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे.


टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अयोध्येत निर्मित होणारे हे हॉटेल १.३ एकरमध्ये पसरलेले असेल. ज्यामध्ये १५० खोल्या असतील. हे हॉटेल इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) ब्रँडच्या नियंत्रणाखाली निर्मित केलं जाईल.


यूपीची होणार चांदी; वार्षिक उत्पन्नात होणार २५ हजार कोटींची वाढ


अयोध्येच्या संपूर्ण बदलाची तयारी सुरू आहे. केवळ टाटा समूहच नाही तर देशातील इतर समूह आणि हॉटेल कंपन्याही येथे गुंतवणूक करत आहेत. रिअॅल्टी क्षेत्रातही प्रचंड गुंतवणूक होत आहे. या शहरात २५ हजार कोटी रुपयांची ग्रीनफिल्ड सिटी उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार आहे. रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. एकूणच शहरात १० अब्ज डॉलर्स म्हणजेच ८० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्याच्या वार्षिक उत्पन्नात २५ हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे.


Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या