श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदाचा मुहूर्त, जाणून घ्या वेळ

  98

मुंबई: अयोध्येच्या राम मंदिरात २२ जानेवारी म्हणजेच आज श्री रामांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या प्राण प्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशभरात भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.


राम मंदिरा तीर्थक्षेत्र ट्रस्टने श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरातील विद्वान आणि वरिष्ठ ज्योतिषाचार्यांकडून याचा शुभ मुहूर्त काढला आहे.



८४ सेकंदाचा मुहूर्त


श्री रामांची प्राणप्रतिष्ठा अति सूक्ष्म मुहूर्तात होईल. यासाठी केवळ ८४ सेकंदाचा वेळ मिळणार आहे. प्राण प्रतिष्ठेचा हा मुहूर्त पंडित गणेश्वर शास्त्री यांनी काढला आहे.


असे मानले जात आहे की या शुभ मुहूर्ताचा हा क्षण दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे ३२ सेकंदापर्यंत असेल.



२२ जानेवारी तारीख का निवडली?


राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी १७ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंतची ५ तारीख दिल्या होत्या. यात २२ जानेवारीला श्रेष्ठ मानण्यात आले.


ज्योतिष गणनेनुसार २२ जानेवारी मुहूर्त चांगला आहे. ही तिथी आणि मुहूर्त अग्निबाण, मृत्यूबाण, चोरवाण, नृपवाण आणि रोगवाण मुक्त आहे.


या सर्व गोष्टी लक्षात घेता अयोध्येत श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी शुभ तिथी आणि मुहूर्त ठरवण्यात आला.

Comments
Add Comment

मोदींच्या हस्ते तीन वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे एका विशेष समारंभात तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा

उत्तरकाशीत ढगफुटी, पूर, भूस्खलन; महाराष्ट्रातील एक महिला पर्यटक अद्याप बेपत्ता

उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात ढगफुटीनंतर मुसळधार पाऊस पडला आणि पूर

ट्रम्प-पुतिन यांच्या भेटीचे भारताकडून स्वागत

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

पंतप्रधान आज कर्नाटकात, नागपूर-पुणेसह तीन वंदे भारत एक्सप्रेसना दाखवणार हिरवा झेंडा

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १० ऑगस्ट रोजी कर्नाटकला भेट देणार आहेत. ते सकाळी ११ वाजता बेंगळूरु इथल्या

उत्तरकाशीच्या धारली आणि हर्षील गावाची परिस्थिती अजूनही बिकट! २५० लोकं अजूनही अडकलेले

उत्तरकाशी: उत्तरकाशीच्या धारली गावात झालेल्या आपत्तीनंतर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. धारलीकडे जाणारे सर्व

भारत निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई! महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत