नवी दिल्ली : शाळांच्या अवाढव्य फी (School fees) भरता भरता पालकांच्या नाकी नऊ येत असतानाच त्यात कोचिंग क्लासेसच्या (Coaching classes) फीची भर पडते. हे क्लासेस मनाला वाटेल तशा फी आकारतात. शिवाय क्लासशिवाय मुलांचा अभ्यास होत नाही, असा पालकांचा (Parents) एक गोड गैरसमज असतो. त्यामुळे ही फी भरण्यासाठी पालकांची पूर्णपणे तयारी असते. बर्याचदा आई व वडील दोघेही नोकरी करत असल्याने मुलांचा अभ्यास घेण्यासाठी कोणीही उपलब्ध नसल्यामुळेही क्लासचा पर्याय निवडला जातो. कोचिंग क्लासेसला दिलेल्या या अवाजवी महत्त्वामुळे त्यांचा मनमानी कारभार चालू असतो. याला आळा घालण्यासाठीच केंद्र सरकारने (Central government) नव्या सूचना जारी केल्या आहेत, ज्यामुळे अशा क्लासेसना चांगलाच चाप बसणार आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आणलेल्या नव्या नियमावलीनुसार १६ वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. तसेच चांगले मार्क्स आणि रँक मिळवून देण्याची दिशाभूल करणारी जाहिरातही करता येणार नाही. कोचिंग सेंटर्सचं नियमन आणि त्यांना कायदेशीर चौकटीत आणण्याची गरज होती. तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या अनियंत्रण वाढीवर रोख लावण्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, आगीच्या घटना, कोचिंगच्या घटनांमध्ये सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या अध्यापनाच्या पद्धतींबाबत सरकारकडं आलेल्या तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांच्या समुपदेशन प्रणाली असल्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही. या सर्व नियमांचा विद्यार्थ्यांना व पालकांना फायदाच होणार आहे. शिवाय क्लासमध्ये ठराविक मार्क्स आणायचेच अशा दडपणाखाली अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या कुवतीप्रमाणे अभ्यास करता येणार आहे. क्लास व शाळा अशा दोन ठिकाणच्या दोन वेगवेगळ्या पद्धतींमुळे व दोन्ही ठिकाणी दिल्या जाणार्या गृहपाठामुळे विद्यार्थ्यांना जखडून राहावे लागत होते. नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त त्यांचे छंद जोपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…