Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या दर्शनासाठी आता हेलिकॉप्टर सेवा!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशात करणार प्रारंभ


अयोध्या : अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा (Ramlalla Pran Pratishtha) अभूतपूर्व सोहळा आता केवळ चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी अयोध्येत भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. वाढणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना हा सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच श्रीरामाच्या दर्शनाची आस लागलेल्या भाविकांसाठी उत्तर प्रदेशचे सरकार (Uttar Pradesh government) हेलिकॉप्टरची सेवा (Helicopter service) सुरू करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हे लखनौहून या सेवेचा प्रारंभ करणार आहेत.


उत्तर प्रदेशमधील सहा जिल्‍ह्यांमधून हेलिकॉप्टरने अयोध्येला जाता येणार आहे. भाविकांना अयोध्यानगरी आणि राम मंदिराच्या हवाई दर्शनाचीही सोय करण्यात येणार आहे. याची जबाबदारी पर्यटन विभागाकडे देण्यात आली आहे. मथुरेतील बरसाना येथील गोवर्धन परिक्रमेजवळ आणि आग्र्यातील आग्रा द्रुतगती मार्गाजवळही हेलिपॅड उभारले आहे. हे अंतर क्रमशः ४५६ आणि ४४० किलोमीटर एवढे आहे.



कसे असेल मंदिराचे हवाई दर्शन?


शरयू नदीच्या किनाऱ्यावरील पर्यटक निवासाजवळ हेलिपॅडची उभारणी करण्यात आली आहे. भाविकांना हेलिकॉप्टरने राममंदिर, हनुमानगढी शरयू घाटा समेत प्रेक्षणीय स्थळांच्या हवाई दर्शनाची सोय असणार आहे. ही हवाई सफर १५ मिनिटांची असेल. हवाई दर्शनासाठी प्रति व्यक्ती ३ हजार ५३९ रुपये भाडे आकारले जाणार आहे. एका वेळी एका हेलिकॉप्टरमध्ये पाच भाविक असतील. भाविक गोरखपूरहूनही उड्डाण करू शकतील. गोरखपूर ते अयोध्या हे १२६ किलोमीटर अंतर आहे. सुमारे ४० मिनिटांच्या सफरीसाठी प्रति व्यक्ती ११ हजार ३२७ रुपये शुल्क असणार आहे.



वाराणसी किंवा लखनौ ते अयोध्याही करता येणार उड्डाण


वाराणसीतील नमो घाटावरून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध केली जाणार आहे. हे सुमारे १६० किमी अंतर असून प्रवासाचा काळ ५५ मिनिटे आहे. यासाठी प्रति व्यक्ती १४ हजार १५९ रुपये तिकीट आकारले जाईल. तसेच लखनौमधील रमाबाई येथून देखील उड्डाण करता येणार आहे. हे १३२ किमी अंतर ४५ मिनिटांत कापले जाईल व त्यासाठी प्रति व्यक्ती १४ हजार १५९ रुपये तिकीट आकारण्यात येईल.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व