एअरस्ट्राईकने चिडलेल्या पाकिस्तानने इराणमधील राजदूतांना माघारी बोलावले, आता चीनचेही विधान

नवी दिल्ली: पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या तळांवर इराणने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तान चांगला भडकला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने इराणधील आपल्या राजदूतांना माघारी बोलावले आहे. इतकंच नव्हे तर पाकिस्तानात इराणचे राजदूतही इराणमध्येच आहे. त्यांनाही सांगण्यात आले आहे की इतक्या त्यांना पाकिस्तानात येण्याची गरज नाही.


याआधी मंगळवारी इराणने बलुचिस्तानमध्ये जैश अल अदलच्या दोन तळांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले होते. पाकिस्तानने त्यानंतर या हल्ल्याला दुजोरा देताना दोन मुले मारले गेल्याची तसेच तीन जण जखमी झाल्याचा दावा केला होता.



इराणवर भडकला पाकिस्तान


पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी केलेल्या विधानानुसार गेल्या रात्री इराणने पाकिस्तानचा सार्वभौमत्व आणि आतरराष्ट्रीय कायदा मोडत त्यांना उकसवेल अशी कारवाई केली. इराणचे हे बेकायदेशीर पाऊल अजिबात स्वीकारार्य नाही. तसेच हे उचित ठरणार नाही. पाकिस्तानकडेही अशा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.


विधानानुसार, या घटनेवर इराण सरकारला संदेश दिला आहे की पाकिस्तानने इराणमधील आपल्या राजदूतांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानात इराणचे राजदूत सध्या इराणमध्येच आहेत. त्यांना इतक्यात पाकिस्तानात परतू नये असे सांगण्यात आले आहे. आम्ही इराणसोबतचे सर्व उच्चस्तरीय दौरे निलंबित केले आहेत.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल