यशस्वी जायसवाल, शिवम दुबेला बीसीसीआयकडून मिळणार बक्षीस, कमाईत कोट्यावधींचा होणार फायदा

मुंबई: अफगाणिस्तानविरुद्ध(india vs afganistan) खेळवल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शानदार कामगिरीनंतर यशस्वी जायसवाल(yashaswi jaiswal) आणि शिवम दुबे(shivam dubey) यांचे नशीब चमकणार आहे. बीसीसीआयने या दोन खेळाडूंना बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. यशस्वी जायसवाल आणि शिवम दुबे यांना या मालिकेनंतर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीत सामील केले जाऊ शकते. गेल्या वर्षी जेव्हा बीसीसीआयकडून २६ खेळाडूंना हे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते तेव्हा या खेळाडूंचे नाव यात नव्हते.


यशस्वी जायसवालला गेल्या वर्षी टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाली होती. पदार्पणानंतर जायसवाल ४ कसोटी आणि १६ टी-२० सामने खेळला आहे. तर शिवम दुबेने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती यामुळे त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. शिवम दुबे साधारण तीन वर्षे टीम इंडियातून बाहेर राहिले. दरम्यान, आता दुबेने फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली आहे. दुबेने अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यात नाबाद अर्धशतक ठोकले.



टी-२० विश्वचषकात मिळणार संधी?


यशस्वी जायसवाल आणि शिवम दुबेने या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठीही दावेदारी मजबूत केली आहे. टीम मॅनेजमेंटने स्पष्ट केले की रोहित शर्मासोबत यशस्वी जायसवाल फर्स्ट चॉईस ओपनर आहे. जर जायसवालने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली तर त्याला विश्वचषक खेळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.


तर शिवम दुबेने ऑलराऊंडर म्हणून दावेदारी सादर केली आहे. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने बॅकअप ऑलराऊंडरम्हणून संघाकडून शिवम दुबेपेक्षा चांगला पर्याय नाही. शिवम दुबेला संघात कायम राहण्यासाठी स्वत:ला आणखी सिद्ध करावे लागेल. गेल्यावर्षीप्रमाणेच त्याने यंदाच्या आयपीएलमध्येही चांगली कामगिरी कायम ठेवली तर हार्दिक पांड्याला ते भारी पडू शकते.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य