Mumbai Water supply : मुंबईच्या तीन विभागांत १७ जानेवारीला पाणीपुरवठा बंद!

जाणून घ्या तुमच्या परिसरात पाणी येणार की नाही...


मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 'ई' विभागातील पाणीपुरवठा (Mumbai Water supply) सुव्यवस्थित करण्याकरिता नव्या जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईच्या ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. तर या काळात जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असं आवाहन महापालिकेने केलं आहे.


नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी बंद करुन सदर ठिकाणी नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या १२०० मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवार १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून ते गुरुवार, १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

सदर तपशील मुंबई महापालिकेने एक निवेदन प्रसिद्ध करून दिलं असून तो खालीलप्रमाणे आहे,



ए विभाग :


सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमा या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.



ई विभाग :


नेसबीट झोन, म्हातारपाखाडी रोड, डॉकयार्ड रोड झोन, हातीबाग मार्ग, जे. जे. रुग्णालय, मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, रे रोड झोन, माऊंट या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.



बी विभाग :


बाबूला टँक झोन, डोंगरी बी झोन, डोंगरी ‘ए’ झोन, मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, मध्य रेल्वे – रेल्वे यार्ड, वाडी बंदर, आझाद मैदान बुस्टींग या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.


संबंधित परिसरातील नागरिकांना पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा आणि दिनांक १७ व १८ जानेवारी २०२४ रोजी पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना