तणावापासून सुटका हवीये तर आजपासून खा हे फळ, होतील हे फायदे

मुंबई: आजकालच्या धावपळीच्या युगात तणाव म्हणजेच स्ट्रेस ही एक सामान्य समस्या बनली आहे. काम, कुटुंब, वेळेची कमतरता आणि विविध प्रकार्या जबाबदाऱ्यांमुळे लोकांचा तणाव वाढत चालला आहे. आजकल तरूण पिढीला स्ट्रेस वाढत चालला आहे. कारण त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. तसेच भविष्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. सोबतच नोकरी, नातेसंबधाचाही त्यांच्यावर दबाव असतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का काही फळे तुम्ही रोजच्या डाएटमध्ये सामील कराल तर हा तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.


काही फळांमध्ये अँटी स्ट्रेस गुण असतात. यातील व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अँटी ऑक्सिडंट तत्व स्ट्रेस हार्मोन कमी करण्यास मदत करतात. जाणून घेऊया या फळांबद्दल...



केळे


केळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन बी६ सारखी पोषक तत्वे असतात जे स्ट्रेस हार्मोन कमी करण्यास मदत करतात. पोटॅशियम असे मिनरल आहे जे तणाव नियंत्रित करण्यास कमी करते. हे डोके शांत ठेवण्याचे काम करते. व्हिटामिन बी६, सेरोटोनिन नावाचे न्यूरोट्रान्समीटरचे उत्पादन वाढवण्याचे काम करते.



सफरचंद


सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटामिन सी आणि फायबर असते जे तणाव कमी करण्यास मदत करते. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने तणाव कमी होतो. सफरचंदामध्ये अनेक पोषकतत्वे असतात जे तणाव कमी करण्यास मदत करतात. सफरचंदामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात यामुळे पेशींना नुकसान होण्यापासून मदत होते. सोबतच शरीराचा स्ट्रेसही कमी होतो. याशिवाय सफरचंदामध्ये व्हिटामिन सी आढळते. व्हिटामिन सीमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. सफरचंद खाल्ल्याने तणाव जाणवत नाही.



डाळिंब


डाळिंब हे एक असे फळ आहे ज्यामुळे तणाव कमी होण्यास होते. डाळिंबामध्ये व्हिटामिन सी आणि अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. व्हिटामिन सी आपल्या शरीरातील पेशींचे आरोग्य चांगले राखतात आणि तणाव हा्र्मोन कमी करतात. अँटी ऑक्सिडंट फ्री रॅडिकल्शी लढतात .



नासपती


नासपतीमध्ये व्हिटामिन बी आढळते. हे व्हिटामिन आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. बी व्हिटामिनमुळे असे काही रसायन तयार होते ज्याचे नाव आहे सेरोटोनिन. सेरोटोनिन मेंदूमध्ये आढळणारे रसायन आहे. यामुळे मूड चांगला राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे