Ram Mandir Inauguration : श्रीरामाच्या मंदिरासाठी नियतीने आधीच पंतप्रधान मोदींना निवडलं होतं!

लालकृष्ण अडवाणींना आपल्या विशेष लेखात दिला आठवणींना उजाळा...


मुंबई : अयोध्येत २२ जानेवारीला होणार्‍या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir Pran Pratistha) सोहळ्यासाठी सर्व भारतवासी आतुरले आहेत. जे इतक्या वर्षांत कोणाला जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) करुन दाखवलं. त्यामुळे जगभरात मोदींचं कौतुक होत आहे. त्यातच माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांनीही या सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भगवान प्रभू श्रीरामचंद्राचं भव्य मंदिर (Ayodhya Ram Mandir) तयार करण्यासाठी नियतीने आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड केली होती, असं अडवाणी म्हणाले आहेत.


लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्र धर्म पत्रिकाच्या पुढील विशेष अंकासाठी विशेष लेख लिहिला आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी जी रथ यात्रा काढली, त्याला ३३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या लेखातून आठवणींना उजाळा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या रथयात्रेत लालकृष्ण आडवाणी यांच्यासोबत होते. त्यावेळी नरेंद्र मोदी जास्त प्रसिद्ध नव्हते. पण त्याचवेळी नियतीने त्यांना भगवान प्रभूरामाचं भव्य मंदिर उभारण्यासाठी निवडलं होतं, असं अडवाणी यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.


लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे की, ज्यावेळी रथ यात्रेला सुरुवात केली तेव्हा त्याला इतकं मोठं स्वरुप येईल असे येईल, त्याचं आंदोलनात रुपांतर होईल, असं वाटलं नव्हतं. पण त्याचवेळी भगवान प्रभू श्रीरामाने आपल्या भव्य मंदिर निर्मितीसाठी आपल्या भक्ताला (नरेंद्र मोदी) निवडलं होतं. नियतीने तेव्हाच ठरवलं होतं, अयोध्यामध्ये भगवान प्रभू श्रीरामाचं मंदिर होणार, त्यासाठी नरेंद्र मोदी यांना निवडलं होतं.



वाजपेयींची कमी जाणवते...


राम मंदिर आंदोलन राजकीय प्रवासाथील सर्वात निर्णायक आणि परिवर्तनकारी असल्याचं लालकृष्ण अडवाणी आपल्या लेखात म्हणाले आहेत. इतकेच नाही तर लालकृष्ण आडवणी यांनी आपल्या लेखात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केलाय. राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाआधी अटल बिहारी वाजपेयी यांची कमी जाणवत असल्याचे आडवणी यांनी सांगितलेय.



पंतप्रधान देशातील प्रत्येक नागरिकाचं प्रतिनिधित्व करतील


राम मंदिराचे स्वप्न साकार करून अयोध्येत रामलल्लाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल अडवाणी यांनी आपल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करतील, तेव्हा ते देशातील प्रत्येक नागरिकाचं प्रतिनिधित्व करतील, असंही अडवाणी यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.


Comments
Add Comment

Agni-6 Missile : भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे जगभर खळबळ; ओडिशा किनारपट्टीवरून ‘अग्नी-6’ क्षेपणास्त्र चाचणीची चर्चा

ओडिशा : भारताने गुरुवारी (७ मे) सायंकाळी Odisha किनारपट्टीवरून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) चाचणी केल्याची

DRDO News : भारताची संरक्षण क्षेत्रात मोठी झेप! ओडिशात स्वदेशी ‘TARA’ ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी

ओडिशा : ओडिशाच्या किनारपट्टीवर भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. Defence

TVK crosses 118 mark : तमिळनाडूत थलपती विजय यांचा मास्टरस्ट्रोक! एका झटक्यात फिरवला गेम, सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला

तमिळनाडू : तमिळनाडूच्या राजकीय मैदानातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड समोर येत आहे. अनेक दिवसांपासून सुरू

West Bengal Next Deputy CM : पश्चिम बंगालमध्ये सत्तेचा 'महाराष्ट्र पॅटर्न'! भाजप देणार दोन उपमुख्यमंत्री ? शुभेंदू अधिकारींकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा?

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला प्रचंड वेग आला आहे. मिळालेल्या ताज्या

Mumbai-Bengaluru Superfast Train : प्रवाशांची प्रतीक्षा संपली! मुंबई-बंगळुरू सुपरफास्ट ट्रेनला हिरवा कंदील; लवकरच 'वंदे भारत स्लीपर'चीही शक्यता

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी बुधवारी प्रवाशांना एक मोठी

Telangana Shocking Video : भररस्त्यात थरार! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या; व्हिडिओ पहा

तेलंगणातील सूर्यापेट (Telangana Suryapet) जिल्ह्यातील कोदाड येथे बुधवारी रात्री एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना