Eknath Shinde : २०१९ मध्ये जनतेसोबत बेईमानी केलेल्यांना मोठी चपराक मिळाली!

  117

आमदार अपात्रतेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य


मुंबई : अनेक महिने प्रतिक्षेत असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या (Shivsena MLA Disqualification) निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचंच पारडं जड ठरलं. शिंदेंचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल देत दोन्ही बाजूंकडच्या आमदारांना अपात्र न करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी रात्री संवाद साधला व विरोधकांवर हल्लाबोल चढवला. 'हुकुमशाहीने पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका बसला', असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.


एकनाथ शिंदे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय म्हणजे सत्याचा आणि लोकशाहीचा विजय आहे. सत्तेत आल्यापासून कायम एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार असे सारखे काहीजण बोलत होते. परंतु अजूनही मी सत्तेत कायम आहे. हुकुमशाहीने पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका मिळाला आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विजय आहे. आजचा जो निर्णय झालेला आहे तो प्रत्येक ठिकाणी एक माइल स्टोन ठरणार आहे. हा निर्णय जनतेच्या दृष्टीने खूप योग्य आहे.


आमदार अपात्रचा प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधक कोणालाच मानत नाहीत. निवडणूक आयोग, न्यायालयाला देखील मानत नाहीत. ते सर्व संस्थांपेक्षा नेहमी स्वतःला मोठे मानतात. सुप्रीम कोर्टाला देखील अनेक सल्ले देण्याचं त्यांनी काम केलं म्हणून त्यांना आज मोठी चपराक मिळाली आहे. २०१९ मध्ये ज्यांनी जनतेसोबत बेईमानी केली त्यांना हा मोठा चपराक आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.



आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४५ हून अधिक जागा आमच्याच


२०१९ साली बाळासाहेबांचे विचार विकले आणि सत्तेसाठी केले. बाळासाहेबांनी काँग्रेसला कधी जवळ गेले नाही. सत्तेसाठी यांनी काँग्रेसला जवळ केले आणि सरकार स्थापन केले. बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा चालवणाऱ्या खऱ्या शिवसेनाला आज न्याय मिळाला आहे. प्रभू श्रीरामाने २२ जानेवारीच्या अगोदर आशीर्वाद दिला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या आधी निर्णय आल्याने सर्व जनतेला न्याय मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४५ हून अधिक जागा आम्ही जिंकून येणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Comments
Add Comment

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची