Digha Railway Station : 'दिघा' रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

  121

अनेक महिन्यांपासून होतं प्रलंबित


ठाणे : ठाणे ते वाशी (Thane to Vashi) या ट्रान्स हार्बर मार्गिकेदरम्यान (Trans harbour line) 'दिघा' हे नवं रेल्वे स्थानक (Digha Railway Station) उभारण्यात आलं होतं. मात्र, नऊ महिन्यांपासून या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन प्रलंबित होतं. अखेर हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच उरण रेल्व मार्गिकेचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदींच्या हस्तेच केले जाणार आहे.


दिघा रेल्वे स्थानकासाठी ४२८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या स्थानकाचं बांधकाम नऊ महिन्यांपूर्वीच पूर्ण झालं होतं. मात्र, अजूनही या स्थानकावर ट्रेन थांबत नव्हती. दिघा परिसरात मोठी लोकवस्ती आहे. तिथे आयटी कंपन्याही आल्या आहेत. तसेच, अनेक लोक दिघा एमआयडीसी परिसरात कामासाठी येतात. मात्र, त्यांना जवळचे असे स्थानक नव्हते. त्यामुळे रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा किंवा बसचा वापर करावा लागत होता. तसेच दिघा एमआयडीसीमध्ये येणाऱ्या कामगार वर्गाला ऐरोली स्थानकात उतरावे लागत होते.


या सगळ्याचा विचार करुन दिघा रेल्वे स्थानक बांधण्यात आले, मात्र त्याच्या उद्घाटनाला अनेक महिने मुहूर्त मिळत नव्हता. अखेर आता उद्घाटन ठरले असून ते पंतप्रधान मोदींच्या हस्ते आजच होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, रायगडला रेड अलर्ट, पुण्यात ऑरेंज अलर्ट

मुंबई : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार काही भागात पावसाने

हिंदवी पाटीलला अश्रू अनावर; सह्याद्री अमृततुल्यावर PMC ची कारवाई!

पुणे : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा हिंदवी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण काहीसे दुःखद आहे.

प्रवेश घ्या आणि कॉपी करून पास व्हा!

मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावर कॉपी प्रकरण; चौकशीत ३२ विद्यार्थी निलंबित यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी

Palki Sohala : देहू-आळंदीत वारीच्या सोहळ्याची लगबग सुरु!

बुधवारी तुकोबा, गुरुवारी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील वारकऱ्यांना ओढ लागते

Ajit Pawar : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- अजित पवार

पुणे : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी

Pune News : सावधान! पुण्यात जलजन्य आजारांचा धोका

कडक उन्हापासून दिलासा देणारा पावसाळा ऋतू. मात्र यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस धुमाकूळ घालतोय. पुण्यात या