Tamilnadu rain : तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीमुळे शाळांना दिली सुट्टी

काही विद्यापीठांच्या परिक्षाही ढकलण्यात आल्या पुढे


चेन्नई : देशात इतर राज्यांमध्ये कडाक्याची थंडी (Winter) आहे, तर तामिळनाडूमध्ये मात्र मुसळधार पाऊस (Tamilnadu rain) सुरु आहे. काल या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी (Holiday) जाहीर करण्यात आली, तर काही विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात (Exams postponed) आल्या.


तमिळनाडूत अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्यातील कुड्डलोर, विल्लुपूरम, मायिलाडुथुराई, नागापट्टण, रानिपेट, वेल्लोर, तिरूवन्नमलाई, तिरूवरूर, कल्लाकुरिची आणि चेंगालपट्टू आदी जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला.


अण्णामलाई विद्यापीठानेही पावसामुळे सुटी जाहीर केली. विद्यापीठाच्या परिपत्रकात म्हटले आहे, की पावसामुळे विद्यापीठाची तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाची नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेची नवीन तारीख नंतर घोषित करण्यात येईल. तमिळनाडूप्रमाणेच पुदुच्चेरीतही मुसळधार पावसामुळे शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. नुकतेच डिसेंबरमध्ये दक्षिण तमिळनाडूतील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला होता.



तमिळनाडूत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता


तमिळनाडूत अनेक ठिकाणी पुढील सात दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यातील तिरूवरूर, नागापट्टण, कुड्डलोर आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पुदुच्चेरी व कराईकल भागात एक-दोन ठिकाणीही पावसाचा अंदाज आहे.



प्रमुख ठिकाणांचा पाऊस


नागापट्टण - १६.७ सेंमी


कराईकल - १२.२ सेंमी


पुदुच्चेरी - ९.६ सेंमी


कुड्डलोर - ९.३ सेंमी

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी