Coastal Road : कोस्टल रोडचं ८३% काम पूर्ण; याच महिन्यात होणार खुला

Share

मुंबई ते रायगड अंतर बारा मिनिटांत कापता येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

मुंबई : मुंबईच्या लोकसंख्येत (Mumbai Population) आणि पर्यायाने वाहतूक कोंडीत (Traffic Jam) दिवसेंदिवस वाढ होत आहे. नेहमीच्या ट्रॅफिक जामला मुंबईकर वैतागले असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं (Coastal Road) ८३% काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत मुंबईकरांकरता कोस्टल रोडच्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. मुंबई आयुक्त इक्बाल चहल हे देखील यावेळी उपस्थित होते.

कोस्टल रोडची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोस्टल रोडच्या एका टनलचं (Tunnel) काम मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-फेस ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. तर दुसऱ्या टनलचं काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल. दोन्ही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास धूर बाहेर फेकला जाईल अशी प्रणाली करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मविआ सरकारवर साधला निशाणा

मुख्यमंत्री म्हणाले, कोस्टल रोड ३१ जानेवारीला सुरु होईल. एमटीएचएल १२ जानेवारीला खुला होईल. यामुळे १२ मिनिटांत रायगड जिल्ह्यात जाता येणार आहे. हे सर्व विकासाचे प्रकल्प आहे. कोस्टल रोड वरळीपर्यंत न थांबता वांद्रे – वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार जाता येणार आहे. ही सर्व रखडलेली काम होती, आधीच्या लोकांनी ही कामं बंद पाडली होती, गतीमान पद्धतीनं आपण काम करतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला.

मुंबईला होणारा धोका टाळण्यासाठी दर सहा महिन्यांनी दिला जातो अहवाल

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था या समुद्राच्या अभ्यास करणार्‍या यंत्रणेने कोस्टल रोडच्या कामामुळे समुद्रावर होणारा परिणाम, समुद्राचे तापमान, लाटांचा पॅटर्न, गढूळपणा यांचा अभ्यास केला. दर सहा महिन्यांनी सरकारकडे या यंत्रणेकडून अहवाल दिला जातो. त्यामुळे समुद्रातील आगामी धोक्यांची सूचना यंत्रणेला मिळू शकते .

तसेच कोस्टल रोड आणि पर्यायाने मुंबईचं संरक्षण करणारी समुद्र भिंत श्रीलंका आणि फ्रान्स या देशांतील कामांचा अभ्यास करुन बनवली गेली आहे. समुद्र भिंत बांधतांना नैसर्गिक खडक समुद्रातील जैवविवीधतेला पुरक असे निवडले गेले आहेत. समुद्र लाटांचा प्रभाव कमी करणारे तंत्र समुद्र भिंत बांधतांना वापरले गेले आहेत, ज्यामुळे मुंबईला संभाव्य धोक्यांपासून वाचवता येणार आहे.

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

30 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago