
नवी दिल्ली: भारतीय नौदलाने(indian navy) शुक्रवारी धाडसी कारवाई करताना सोमालियाजवळ अपहरण करण्यात आलेल्या एमव्ही लीला नारफॉक या जहाजावरील १५ भारतीयांना सुखरूप सोडवले. समुद्री चाच्यांकडून या जहाजाचे अपहरण करण्यात आले होते मात्र भारताच्या नौदलाने धडाकेबाज कारवाई करताना या जहाजावरील १५ भारतीयांची सुखरूप सुटका केली तसेच इतर सहा क्रू कर्मचाऱ्यांचीही सुटका करण्यात आली.
#WATCH | Indian Navy’s boat near the hijacked vessel MV Lili Norfolk in the Arabian Sea. Indian Navy commandos secured the hijacked ship and rescued the crew including 15 Indians. The sanitisation operations are still on: Indian Navy officials pic.twitter.com/fJz02HSExV
— ANI (@ANI) January 5, 2024
नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर अरबी समुद्रात एमव्ही लीला नॉरफोक या जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती भारतीय नौदलाला मिळाली. त्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली. भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी या अपहरण कर्त्यांविरोधात कारवाईचे आदेश भारताच्या युद्धनौकांना दिले. त्यानंतर येथील जहाजावरील १५ भारतीयांसह २१ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. नौदलाच्या मार्कोस कमांडर्सकडून ही कारवाई करण्यात आली.
Indian Navy Chief Admiral R Hari Kumar has issued directives to the Indian warships operating in the Arabian Sea to take the strictest possible action against the pirates. Four Indian Navy warships are mission deployed in the Arabian Sea to deter attacks on merchant ships in the… pic.twitter.com/rZNatUuHRz
— ANI (@ANI) January 5, 2024
दरम्यान, जहाजावर शोधमोहीम घेतली असताना नौदलाला येथे समुद्री चाचे आढळले नाहीत. या चाच्यांनी जहाजावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते आश्रय घेऊन लपून बसले होते अशी माहिती सुटका झालेल्या सदस्यांनी दिली.